मुंबई : विषारी द्रव प्राशन केल्यामुळे कांदिवली येथील एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.  पतीसोबत वैयक्तिक मुद्द्यांवरून वाद झाल्याने तिने आत्महत्या केल्याचे समजते. मृत महिला पती आणि दोन मुलींसह कांदिवली येथे राहत होती.

समता नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री महिला आणि तिच्या पतीमध्ये जोरदार वाद झाला होता. विविध ठिकाणी जाऊन योगावर्ग घेण्यापेक्षा ऑनलाईन वर्ग घ्यावेत अशी पतीची इच्छा होती. त्यानंतर रविवारी सकाळी पतीला ती खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यांनी तिला खासगी रुग्णालयात नेले, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. मृतदेह घरी परत नेल्यानंतर अत्यसंस्कारसाठी सर्व नातेवाईकांना कळवण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक घरी जमू लागले. त्यावेळी परिसरातील एका व्यक्तीने समता नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस त्याच्या घरी गेले आणि त्यांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला.

Father and son imprisonment, imprisonment beat police,
मुंबई : कर्तव्या बजावणाऱ्या पोलिसांना मारहाण करणे महागात, पिता-पुत्राला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Rajasthan elderly couple suicide
उपाशी ठेवून भीक मागायला सांगितलं, पोटच्या मुलांकडून संपत्तीसाठी आई-वडिलांचा छळ; वृद्ध दाम्पत्यानं जीवन संपवलं
young man dies due to cardiac arrest while playing garba
Video : गरबा खेळत असताना तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू; क्षणात होत्याचं नव्हतं झालं अन्…
Girl sexually assaulted in Uttarakhand by friend with mothers consent in Kalyan
कल्याणमधील आईच्या सहमतीने मित्राकडून मुलीवर उत्तराखंडमध्ये लैंगिक अत्याचार
school van driver rapes school girl
पुण्यातील वानवडी लैंगिक अत्याचार प्रकरणात वापरलेल्या स्कूल व्हॅनची तोडफोड
censor board clear stand on emergency movie in bombay high court
इमर्जन्सी’तील काही दृश्यांना कात्री लावल्यास प्रदर्शनाला हिरवा कंदील; सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात भूमिका
Due to indebtedness women try to commit suicide in Indrayani river Alandi
आळंदी: इंद्रायणी नदीत ‘ती’ मृत्यूची वाट पाहत बसली; पण नियतीला काही वेगळच…

हेही वाचा >>> मुंबई : आर्थिक घोटाळ्यातील सर्व झोपु प्रकल्पांवरील स्थगिती ‘ईडी’कडून मागे!

या घटनेनंतर आपण मानसिकदृष्ट्या खचलो असून कायदेशीर प्रक्रियेबद्दल माहिती नसल्याने पत्नीचे पार्थिव थेट घरी आणले, असे पोलिसांनी केलेल्या चौकशीत पतीने सांगितले. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलीस शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. महिलेने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. पण पोलिसांनी त्याबाबत कोणतीही माहित दिलेली नाही. पोलीस दोन्ही मुलींचे जबाबही नोंदवणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.