लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला आहे. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. उन्हामध्ये सातत्याने काम केल्याने शरीरातील तापमान नियंत्रित करण्याच्या यंत्रणेत बिघाड होतो. परिणामी शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे कोणत्याही सुरक्षेशिवाय उन्हात फिरल्यास उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तविण्यात येत आहे.

governor c p radhakrishnan warns poor water quality in rivers like godavari threatens human life
गोदावरीसह काही नद्यांची अवस्था बिकट, राज्यपालांकडून चिंता
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
nashik water news marathi
नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा
Patients of cold cough fever in every house of Nagpur
नागपुरात घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण… तापमान बदलामुळे…
Health Infectious Diseases Climate Change Health news
आरोग्य: भय इथले संपत नाही…
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
The Central Housing Department has asked for additional funds for private developers under the Pradhan Mantri Awas Yojana Mumbai news
पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना जादा निधी? केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून विचारणा

ऑक्टोबर हिटमध्ये उष्णता प्रचंड वाढत असल्याने नागरिकांना उलटी होणे, चक्कर येणे, निर्जलीकरण होणे, बेशुद्ध पडणे, उष्माघाताचा त्रास होतो. मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मुंबईत आर्द्रता अधिक असल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास मुंबईकरांना त्याचा अधिक त्रास होण्याची शक्यता आहे. उन्हाच्या तडाख्यामध्ये शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक असते. उष्णतेमुळे नागरिकांनी पुढील दिवसांमध्ये अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर ऑफ मेडिसिनच्या मुंबई शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी सांगितले.

आणखी वाचा-मुंबई: नोव्हेंबरपासून मेट्रो ३ च्या चाचण्या

वातावरणातील बदलामुळे मागील काही दिवसांपासून मुंबईत उकाडा वाढत आहे. या वाढत्या उन्हात सातत्याने काम करणाऱ्या नागरिकांना डोकेदुखी, लघुशंका करताना जळजळ होणे, पोटात दुखणे, चक्कर येणे यासारखे त्रास होण्याची शक्यता आहे. अनेकदा शरीराचे निर्जलीकरणही होते. त्यामुळे वाढती उष्णता लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हात बाहेर पडणे टाळावे, बाहेर जायचे असल्यास डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल असणे आवश्यक आहे. तसेच पाण्याची बाटली कायम जवळ बाळगावी, अधिकाधिक फळे खावीत, जेणेकरून वाढत्या उन्हाचा त्रास फारसा होणार नाही, असे सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले. उन्हामुळे थकवा येणे, गळून जाणे, चक्कर येणे, ताप येणे व पराकोटीच्या स्थितीत उष्माघात होणे, निर्जलीकरण होणे असे दुष्परिणाम होऊ शकतात.

Story img Loader