मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई शहर, तसेच उपनगरांतील कमाल तापमानात वाढ झाली आहे. सांताक्रूझ येथे शनिवारी ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पारा अधिक असल्याने उन्हाच्या झळा बसत होत्या. अशीच स्थिती पुढील एक – दोन दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मागील दोन दिवसांपासून मुंबईतील तापमानाच्या पाऱ्यात वाढ झाली आहे. मुंबईत शनिवारी दुपारी २ ते ३ दरम्यान उन्हाच्या झळा अधिक होत्या. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी ३३.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदले गेले. दरम्यान, किमान तापमानात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी आणखी घट झाली. मात्र, कमाल तापमानाचा पारा चढा असल्याने दिवसभर मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागला. पुढील एक – दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहील, त्यानंतर कमाल तापमान ३० – ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६ – १८ अंश सेल्सिअस इतके असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Improvement in air quality in Mumbai
मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Maharashtra temperature rise news in marathi
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, पुढील २४ तासात असे असेल तापमान
Mumbais temperature rises weather department observes that summer is in full swing
मुंबईत उन्हाळ्याची चाहूल
pavana dam
पिंपरी : उन्हाचा चटका वाढला; पवना धरणात किती आहे पाणीसाठा?
maharashtra recorded 33 to 35 degrees celsius maximumtemperature
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा; जाणून घ्या, कमाल तापमान का वाढले
weather department predicts rising temperatures in Mumbai with increased afternoon heat expected
मुंबईतील तापमानात वाढ होण्याची शक्यता
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?

हेही वाचा…कुर्ला उन्नत हार्बर मार्गाचे स्वप्न आणखी एक वर्ष लांबणीवर

राज्यातील काही भागात किमान तापमानाच्या पाऱ्यात घट व्हायला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यातील किमान तापमानाचा पारा चढा होता. मात्र, दोन दिवसांपासून किमान तापमानात घट व्हायला सुरुवात झाली आहे. पश्चिमी चक्रावातामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी कमी – अधिक होत आहे. राज्यातील अनेक भागात किमान तापमान ११ अंशाखाली नोंदले गेले. सकाळी काही भागात धुके पडत आहे. तर दुपारी उकाडा सहन करावा लागत आहे. दरम्यान, राज्यामधील तापमानातील चढ – उतार पुढील दोन – तीन दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा…बँकॉकवरून आणलेला सव्वाचार कोटी रुपये किंमतीचा गांजा जप्त, दोन प्रवाशांना अटक

घाटकोपर येथील हवा ‘अतिवाईट’

मागील अनेक दिवसांपासून मुंबईची हवा खालावलेली आहे. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने गेल्या आठवड्यात कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र तरीही काही भागातील हवा अद्याप ‘वाईट’ श्रेणीत नोंदली जात आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार शनिवारी सायंकाळी घाटकोपर येथील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदली गेली. येथील हवा गुणवत्ता निर्देशांक ३१० इतका होता. तेथे पीएम २.५ धुलीकणांची मात्रा अधिक होती. असे वातावरण आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. गोवंडीतील शिवाजीनगर आणि कुलाबा नेव्हीनगर येथेही काही दिवस ‘वाईट’ हवेची नोंद झाली आहे.

Story img Loader