मुंबई : मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांसाठी महानगरपालिकेने काढलेल्या निविदांमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप वारंवार होत आहेत. मात्र, ते सर्व आरोप तथ्यहीन असल्याचा दावा महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, असे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे.महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने नालेसफाईच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. शहर आणि उपनगरांतील छोटे नाले, मोठे नाले आणि मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामासाठी जानेवारी अखेरीस निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र, त्या निविदांपैकी मिठी नदीतील गाळ काढण्याच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाला असल्याचा आरोप आमदार अनिल परब यांनी केला आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना परब यांनी पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा