मुंबई : दोन वर्षांच्या खंडानंतर नागपूरमध्ये सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व अन्य भाजप नेत्यांची महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने, राज्यपालांच्या उचलबांगडीची मागणी, सीमाप्रश्न, उद्योग गुजरातमध्ये जाणे आदी विषय अधिक गाजणार आहेत. यामुळेच हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची परंपरा यंदाही कायम राहील, अशी चिन्हे आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावणे, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहीम, पक्षातील फूट, स्वपक्षाच्या आमदारांच्या रोषामुळे चप्पल घेऊन पळण्याची मुख्यमंत्र्यांवर आलेली नामुष्की हे सारे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातच घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिवाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री बदलल्याची उदाहरणे आहेत. यामुळेच नागपूरचे हिवाळी अधिवेशन नेहमीच मुख्यमंत्र्यांसाठी डोकेदुखी ठरते. यंदाही विविध मुद्दय़ांवरून सरकारला घेरण्याची विरोधकांची योजना आहे. विरोधकांनी ताणून धरल्यास हिवाळी अधिवेशनात कामकाजाऐवजी गोंधळच अधिक होण्याची चिन्हे आहेत.

All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Rashtriya Swayamsevak Sanghs Virat shakha Darshan in Latur on Sunday
रा. स्व. संघाचे लातूरात रविवारी विराट शाखा दर्शन
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
Kriti Sanon joins tere ishq mein
Video : दंगल, जाळपोळ अन् मनात प्रेमाचं वादळ; ‘तेरे इश्क में’ चित्रपटातील क्रिती सेनॉनचा पहिला व्हिडीओ आला समोर
Pimpri , fire, worker house, cash burnt, loksatta news,
पिंपरी : कामगाराच्या घराला भीषण आग, पाच लाखांची रोकड जळून खाक
response on loksatta editorial
लोकमानस : विलंब, नाराजीनाट्यांची मालिका
Ajit Pawar
“जनमानसात खराब प्रतिमा असणाऱ्यांना पक्षात घ्यायचं नाही”, अजित पवारांचा रोख कोणाकडे? राष्ट्रवादीच्या शिबिरात म्हणाले…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाविकास आघाडीने लक्ष्य केले आहे. अधिवेशनाच्या तोंडावर मुंबईत काढण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चातही कोश्यारी यांच्यावर यथेच्छ टीका करण्यात आली. तसेच त्यांची हकालपट्टी न झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा देण्यात आला. विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये कोश्यारी यांना लक्ष्य केले जाईल. तसेच त्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी गोंधळ घातला जाईल, असे सांगण्यात आले. यामुळे सुरुवातीचे तीन ते चार दिवस अधिवेशनात गोंधळ होण्याची चिन्हे आहेत.

या मुद्यांवरून सरकारची कोंडी?

* महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरूनही भाजपची कोंडी करण्याची विरोधकांची योजना आहे. तसेच सीमाभागातील जनतेच्या महाराष्ट्र ठाम पाठीशी उभे आहे, असा ठरावही उभय सभागृहांमध्ये करण्यात येणार आहे.

* ‘वेदान्त – फॉक्सकॉन’, ’टाटा – एअरबस‘ हे गुजरातमध्ये गेलेले प्रकल्प, रायगडमधील औषधनिर्मितीचा राज्याबाहेर गेलेला प्रकल्प यावरून शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याची योजना आहे.

* विदर्भाचा अनुशेष, धान, संत्री, कापूस उत्पादकांना मदत मिळण्यात होणारा विलंब आदी विदर्भाशी संबंधित प्रश्नांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे.

* दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्याचे कसे नुकसान झाले याचा पाढा वाचण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. काही राजकीय चमत्कार होऊ शकतात, असे संकेतही सत्ताधाऱ्यांकडून दिले जात आहेत.

Story img Loader