शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतील गटमेळाव्यात बुधवारी (२१ सप्टेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपा आणि शिंदे गटावर हल्ला चढवला. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलंय. “शिवसेनेचा जन्म १९ जून १९६६ रोजी झाला. तेव्हा उद्धव ठाकरे केवळ सहा वर्षांचे होते,” असं म्हणत खोचक टोला लगावला. तसेच उद्धव ठाकरे आधी मंत्र्यांची बैठक घ्यायचे, आता गटप्रमुखांची बैठक घेतात इथपर्यंत आले आहेत, असा चिमटा काढला. ते गुरुवारी (२२ सप्टेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

नारायण राणे म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी अमित शाहांनी जमीन दाखवा असं वक्तव्य केल्याचं म्हणाले. मात्र, त्याचा अर्थ त्यांना कळाला नाही. शाहांना जमिनीवर या असं म्हणायचं होतं. आता हे म्हणतात आम्ही ‘आसमान’ दाखवू. उद्धव ठाकरे असं कोणाच्या जीवावर म्हणत आहेत? शिवसेनेचा जन्म १९ जून १९६६ रोजी झाला. तेव्हा उद्धव ठाकरे केवळ सहा वर्षांचे होते.”

Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
ubt shiv sena chief uddhav thackeray criticized rebels
आरक्षण दिले तरी लोक डबे बदलतात! पक्षातून बंडखोरी करणाऱ्यांवर उद्धव ठाकरे यांची टीका
Narendra Modi target arvind Kejriwal in lok sabha speech
निधीचा वापर देशासाठीच! पंतप्रधानांचे लोकसभेत प्रत्युत्तर; केजरीवाल यांच्यावर टीका
Draupadi murmu and sonia gandhi
Rashtrapati Bhavan : “राष्ट्रपती थकलेल्या नाहीत”, सोनिया गांधींच्या टीकेनंतर राष्ट्रपती भवनातून प्रत्युत्तर!
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला

“…म्हणून उद्धव ठाकरे शिवसेनेत आले”

“तेव्हापासून शिवसेना मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी संघर्ष करत होती. त्यात उद्धव ठाकरे कुठेच नव्हते. ते १९९९ मध्ये शिवसेनेत सक्रीय झालात. मी मुख्यमंत्री झालो आणि त्यांना घरून कोणीतरी सांगितलं की राणे मुख्यमंत्री झाले, तूही कार्यरत राहा, मुख्यमंत्री होशील. म्हणून ते शिवसेनेत आले. तोपर्यंत ते शिवसेनेत सक्रीय नव्हते. एवढी आंदोलनं झाली, शिवसैनिक लढत होते, मार खात होते, एन्काऊंटर होत होते, तुरुंगात जात होते तेव्हा हे कोठे होते?” असा सवाल नारायण राणेंनी विचारला.

हेही वाचा : “यांना कानाखाली नाही मारायची मग काय…”; नितेश राणेंनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १२ सेकंदांचा ‘तो’ Video

“संपूर्ण आयुष्यात विरोधकाच्या कानफडात तरी मारली का?”

“उद्धव ठाकरेंना ६२ वं वर्ष सुरू आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात विरोधकाच्या कानफडात तरी मारली का? पक्षवाढीसाठी कधी संघर्ष केला का? ते काहीच न करता सरळ मुख्यमंत्रीपदावर आले. तेव्हा मी म्हणालो होतो की हे आयत्या बिळावर नागोबा आहेत,” अशीही टीका राणेंनी केली.

Story img Loader