राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०२१ मधील एका भेटीचा उल्लेख करत मोठा दावा केला आहे. भाजपा-शिवसेना युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मोदींची भेट झाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं मत बदललं होतं आणि ते परत भाजपाबरोबर येण्यास तयार होते, असा दावा अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरे यांनी केला. मात्र, ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी हा दावा फेटाळला आहे. तसेच तटकरे खोटं बोलत असल्याचा आरोप केला.

सुनील तटकरे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी २०२१ मध्ये अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर माझी संजय राऊतांबरोबर बैठक झाली तेव्हा मला कळलं की, दिल्लीतील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींबरोबर एकांतात चर्चा झाली.”

Devendra Fadnavis , Raj Thackeray,
राजकीय भेटीगाठींनी तर्कवितर्क! मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला; ठाकरे गटाचे नेतेही मुख्यमंत्र्यांकडे
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Uddhav Thackery News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा सवाल, “पंतप्रधान मोदींनी महाकुंभात डुबकी मारली, पण गणपती विसर्जन करु देत नाही हेच तुमचं हिंदुत्व?”
Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न

“उद्धव ठाकरे पुन्हा भाजपाबरोबर जाण्याचा विचार करत होते”

“माझी संजय राऊत यांच्याबरोबर बैठक झाली तेव्हा तेथे एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकरही हजर होते. त्यावेळी संजय राऊतांनी मला सांगितलं की, मोदींबरोबरच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे आपलं मत बदलण्याची शक्यता होती आणि ते पुन्हा भाजपाबरोबर जाण्याचा विचार करत होते,” असंही सुनील तटकरेंनी सांगितलं.

हेही वाचा : “बंडखोर आमदारांना तत्काळ अपात्र करा”, शरद पवार गटाच्या मागणीवर सुनील तटकरे म्हणाले…

“राऊतांनी आमच्यावर टीका करताना विचार करून भाषा वापरावी”

उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही बैठक दिल्ली भेटीनंतर १५ दिवसांनी झाल्याचंही तटकरेंनी नमूद केलं. तसेच संजय राऊतांनी आमच्यावर टीका करावी, मात्र भाषा विचार करून वापरावी, असा इशारा दिला. राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटावर अनावश्यक टीका करण्याची गरज नाही, असंही तटकरेंनी म्हटलं.

Story img Loader