मुंबई : ‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदासाठी निश्चितच शुभेच्छा आहेत. पण, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत आणि यापुढेही राहतील. अजितदादा जेव्हा मुख्यमंत्री होतील तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी संधी दिली जाईल’’, अशी गुगली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकली. दुसरीकडे, अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव आत्राम यांनी २०२४ मध्ये अजित पवार हे नक्की मुख्यमंत्री होतील, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले.

अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री धर्मराव अत्राम यांनी केला आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘‘जे नेते राजकारणात आहेत, त्या प्रत्येकाला कुठेतरी व कधीतरी संधी मिळणारच आहे. अजित पवार हे मोठे नेते आहेत. आमच्या शुभेच्छा निश्चितपणे त्यांच्या पाठिशी आहेत. पण, सगळय़ांनी वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि आम्ही एकत्रितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. जेव्हा अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाईल तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी संधी दिली जाईल’’, असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्रीपदी शिंदे हेच कायम राहतील, असे एकीकडे सांगणाऱ्या फडणवीस यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्याने भाजप नेत्यांची भविष्यातील राजकीय योजना काय आहे, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

shrikant shinde
कल्याणमध्ये महेश गायकवाड यांच्याकडून खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाची बॅनरबाजी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Rishi Sunak on Mumbai tour
ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांची मुंबईच्या मैदानात फटकेबाजी
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
Dhananjay Munde on Namdev Shastri Maharaj
Dhananjay Munde : महंत नामदेव शास्त्री महाराजांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर धनंजय मुंंडेंनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “इतकी मोठी शक्ती…”
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
Ashok Saraf
“नशीब काढलंय मी…”, अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सहकलाकाराची खास पोस्ट; म्हणाली…
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना

हेही वाचा >>>“…तर आम्ही सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘पर्मनंट’ करू”, प्रकाश आंबेडकरांची घोषणा

‘‘राज्याच्या राजकारणात भाजप हा मोठा भाऊ आहे. मात्र, २०२४ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार होणार हे निश्चित आहे. देवेंद्र फडणवीस तसे बोललेही आहेत’’, असा दावा अन्न, औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी केला. ज्यांचे संख्याबळ अधिक त्यांचा मुख्यमंत्री, असा काळ आता राहिलेला नाही. असे असले तरी आम्ही सर्वाधिक जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करू. आगामी निवडणूक महायुती म्हणून लढू. त्यामुळे २०२४ मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही आत्राम यांनी व्यक्त केला.

‘याआधी कोणाला घाबरून आमच्याबरोबर यायला तयार होते?’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१९ मध्ये आमच्याशी चर्चा केली होती आणि ते सरकारमध्ये येण्यास तयार होते. ते २०१७ मध्येही सरकारमध्ये सहभागी होणार होते. तेव्हा ते कोणत्या तपास यंत्रणांना घाबरुन येत होते, असा सवाल  फडणवीस यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते का बाहेर पडले, हे शरद पवार यांना नीट माहीत आहे. त्यांच्या मान्यतेनेच आमदारांनी स्वाक्षऱ्या करून भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता, हे अजित पवार यांनीही सांगितले होते. त्यामुळे आता हे नेते पक्षातून बाहेर पडल्यावर आरोप करणे अयोग्य आहे, असे फडणवीस म्हणाले.

Story img Loader