मुंबई: राज्यात महाविकास आघाडी (मविआ) एकसंध ठेवणे ही तीन पक्षाची प्राथमिकता असून लोकसभा अथवा विधानसभा निवडणूकीमध्ये विजयाची शक्यता पाहून मतदारनिहाय जागावाटपाचे सूत्र ठरवावे. जागा वाटपाच्या बाबतीत राष्ट्रवादीची व्यावहारिक भूमिका आहे, अशी  टिप्पणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे.

‘दि इंडियन एक्सप्रेस’च्या ‘टाऊनहॉल’ या कार्यक्रमात तटकरे सहभागी झाले होते.  प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती भिन्न असते. राजकीय समीकरणे वेगळीवेगळी असतात. त्यामुळे जिंकण्याची क्षमता असणारा उमेदावर नजरेसमोर ठेवून आपणास राजकीय डावपेच आखावे लागतात. शेवटी  आकडे महत्वाचे असतात. त्यामुळे प्रसंगी एक पाऊल मागे येत समजूतदारपणा दाखवावा लागतो. आज आमच्यापुढे मविआला अधिक बळकट करणे, ही प्राथमिकता आहे. त्यादृष्टीने जागावाटपाच्या चर्चेला सुरूवात व्हावी, अशी अपेक्षा तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Chandrashekhar Bawankule , Chandrashekhar Bawankule Amravati ,
चंद्रशेखर बावनकुळे यांना सोनेरी मुकूट? चर्चेला उधाण…
upper tehsil office at ashvi in sangamner taluka
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय
GBS , Pune, Pune Municipal Corporation,
पुणे : शहरात ‘जीबीएस’चा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेने घेतले मोठे निर्णय!

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल बोलताना तटकरे यांनी पवार यांच्या क्षमतेचा वारंवार उल्लेख केला. अजित पवार यांना राज्यात लोकांचा वाढता पाठींबा मिळत असून राष्ट्रवादीचे राज्यात मजबूत संघटन आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या विरोधात संशयाचे मळभ निर्माण करण्याचे काम सूरू आहे. हे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून होत नाही मात्र पक्षाबाहेरून हे काम सुरू आहे, असा आरोपही तटकरे यांनी केला.मात्र यांसदर्भात कोणाच्या नावाचा थेट उल्लेख त्यांनी केला नाही.

‘वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत’ मविआचा शत्रू कोण असून कोणाबरोबर लढायचे आहे, हे आपण ओळखले पाहिजे. त्यामुळे मविआमध्ये दरी निर्माण होईल अशी वक्तव्ये नेत्यांनी टाळावीत. कोणत्याही नेत्यांच्या वक्तव्याने मविआमध्ये तणाव न्र्मिाण होईल,अशी विधाने टाळावित. संजय राऊत यांचे ‘सामना’तील लेख अथवा कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली वक्तव्ये टाळली पाहिजेत, अन्यथा आपण विद्यमान सरकार विरोधात कसे उभे राहणार? असा सवाल तटकरे यांनी यावेळी केला.

Story img Loader