गेल्या तीन दिवसांपासून शिवसेना ( शिंदे गट ) नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पण, ठाकरे गटाने हा व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी लगावला आहे. याप्रकरणी ठाकरे गटातील काही जणांना अटकही करण्यात आली आहे. आज ( १४ मार्च ) दुसऱ्या दिवशीही विधिमंडळात हा मुद्दा चर्चीला गेला आहे.

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणातील तरूणांच्या अटकेवरून आक्षेप घेतला. ‘रात्री दोन-दोन वाजता पोलीस घरातून तरूणांना ताब्यात घेत आहेत,’ असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. पण, ‘हा तपासाचा भाग आहे. अशा गोष्टी करताना काही वाटलं नाही का?,’ असं प्रत्युत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं आहे.

Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Crime News
Kolkata Crime : वडिलांच्या प्रेयसीची अल्पवयीन मुलाकडून हत्या, बापाचे विवाहबाह्य संबंध शोधण्यासाठी केला GPS चा वापर
Muramba
Video: रमाच्या आईला ओळखण्यात माही चूक करणार अन्…; अक्षय सत्य शोधून काढणार? ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Flocks of devotees gathered at the Maha Kumbh mela in Prayagraj, Uttar Pradesh on January 29
Mahakumbh 2025 Stampede : ३० लोकांचा बळी कसा गेला? DIG म्हणाले, “भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहात होते, तेवढ्यात…”
an old man in 90s do exercise
VIDEO : नव्वदीतही आजोबा करताहेत व्यायाम! तरुणांनो, मग तुम्ही का कारणं देता? Video Viral
The quality of school students has deteriorated it is clear from the asar survey Mumbai news
शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावलेलीच! ‘असर’च्या अहवालात शैक्षणिक अधोगतीचा पंचनामा
first generation of immigrants is mirror of social changes taking place in India
समृद्ध अडगळीचे ओझे…

हेही वाचा : “पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना गोपीनाथ मुंडेंची आठवण येतेय”, भातखळकरांच्या विधानावर धनंजय मुंडे संतापले; म्हणाले…

“मुख्यमंत्री महोदय अशी अटक बरी नाही”

विधानसभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं, “शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे प्रकरणात एसआयटी नेमलेली आहे. एसआयटीचं कामकाज लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. सोमवारपासून चौदा तरूणांना अटक करण्यात आली. हा व्हिडीओ खरा आहे की मॉर्फ केलेला आहे, याचा निर्णय येऊद्या. पण, लोकांच्या घरी दोन-दोन वाजता पोलीस जाऊन तरूणांना ताब्यात घेत आहेत. त्यांची चुक काय, हे तर कळुद्या. मुख्यमंत्री महोदय अशी अटक बरी नाही. तरूण पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे.”

“त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार…”

याला उत्तर देताना शंभूराज देसाईंनी सांगितलं, “शीतल म्हात्रे आणि राज प्रकाश सुर्वे यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. ही गंभीर बाब आहे. त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार मॉर्फींग करताना झाला आहे. कोणत्याही स्त्रीच्या मनाला हे सहन होणार नाही.”

हेही वाचा : वैभव नाईकांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी; शिंदे गटात प्रवेश करणार? मुख्यमंत्री म्हणाले, “ते रोज मला…”

“अशा गोष्टी करताना काही वाटलं नाही का?”

“रात्री दोन वाजता उचलणे हा तपासाचा भाग आहे. पण, अशा गोष्टी करताना काही वाटलं नाही का? पोलीस त्यांचं काम करत आहेत. तपासात सर्व बाबी पुढे येतील. तपासात सर्व गोष्टी पुढं आल्यावर त्याच्यात कोण दोषी आहेत, हे कळेल,” असं शंभूराज देसाई म्हणाले.

Story img Loader