मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमुळे (अजित पवार गट) महायुतीला राज्यात मोठा पराभव पत्कारावा लागला, हे रा.स्व. संघाशी संबंधित ‘ऑर्गनायझर’मधील लेखाशी राष्ट्रवादी पक्ष सहमत नसून भाजपचे नेतृत्वसुद्धा या लेखातील भूमिकेशी सहमत असणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी अजित पवार गटाने मांडली. तसेच भाजपचा विरोध असला तरी मुस्लीम आरक्षणाचा अजित पवार गटाने पुरस्कार केला आहे.

हेही वाचा >>> स्वतःला निरक्षर घोषित केलेल्या १२१ उमेदवारांचा लोकसभा निवडणुकीत पराभव, काय आहे अहवाल?

संजय राऊतांच्या विधानाने युतीच्या चर्चेला बळ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”

मुख्य प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की, अपशय आल्यानंतर अनेक कारणे शोधली जातात. आरोप-प्रत्योराप होत असतात. ऑर्गनायझरमध्ये आलेल्या लेखाशी भाजपचे नेतृत्व सहमती दाखवणार नाही. पराभवाचा ठपका राष्ट्रवादीवर ठेवता येणार नाही. आमची महायुती ही दिर्घकाळाची आहे. त्यामुळे अजित पवार हे भाजपबरोबर यापुढेही असतील. आता आमचे लक्ष विधानसभा निवडणूक आहे. महायुतीमध्ये कोणताही वाद नाही, मतभेद नाही. झालेल्या चुका विधानसभा निवडणुकीत सुधारल्या जातील. मतभेदाचे निराकरण केले जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांचा राज्यव्यापी दौरा

राष्ट्रवादीसंदर्भात संभ्रम पसरवला जातो आहे. मी दिल्लीत होतो, मात्र आमच्यामुळे महायुतीचा पराभव झाला, असे भाजपचे कोणी म्हणाले नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर अजित पवार राज्यव्यापी दौरा करणार आहेत. यावेळी काहींना सहानुभूती मिळाली पण, ती अधिक काळ राहात नसते, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Story img Loader