Supriya Sule on Ladki Bahin Scheme: “लोकसभेपर्यंत कुणालाही त्यांची बहीण आठवली नाही. निकालानंतरच त्यांना बहिणी आठवायला लागल्या. पण दुर्दैव एका गोष्टीचं वाटतं की, बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही. ते प्रेम आणि व्यवसायात गल्लत करायला लागले. प्रेमात व्यवसाय आणि पैसे आणायचे नसतात. व्यवसायात प्रेम नसतं. कारण तिथं प्रेम आणलं तर तोटा होईल. जर प्रेमात पैसे आणले, तर त्याला नातं म्हणत नाही. दुर्दैव आहे या सरकारचे की, त्यांना प्रेमात आणि पैशांतले अंतरच कळले नाही”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज महाविकास आघाडीच्या मेळाव्यात केली.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा मेळावा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभेच्या निकालाचा हवाला दिला. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर टीका केली.

Karnataka man return to india from russia
“आम्ही भारतात जिवंत परत येऊ असं वाटलं नव्हतं”; रशिया-युक्रेन युद्धात लढलेल्या कर्नाटकच्या तिघांनी सांगितली आपबीती!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
Guru vakri 2024
१२ वर्षानंतर गुरू चालणार उलट चाल, ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळणार छप्परफाड पैसा
badlapur rape case marathi news
मैत्रिणीकडून गुंगीचे औषध, मित्रांकडून बलात्कार; बदलापुरातील खळबळजनक घटना, आरोपी अटकेत
sharad pawar criticized hasan mushrif
“ज्यांना मोठं केलं, तेच संकटकाळी सोडून गेले, त्यांचा आता…”; नाव न घेता हसन मुश्रीफांवर शरद पवारांचा हल्लाबोल!
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”

हे वाचा >> ‘मविआ’चा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरेंची घोषणा; म्हणाले, “माझा पाठिंबा…”

बहीण-भावाच्या नात्याला किंमत लावण्याचे पाप

सुप्रिया सुळे आपल्या भाषणात म्हणाल्या, “ते (महायुतीचे पक्ष) बोलताना म्हणतात की, एक बहीण गेली तर हरकत नाही. आपण दुसऱ्या बहिणी आणू. १५०० रुपयांमध्ये विकत घेता येईल, इतके हे नाते विकाऊ नाही. हा आमच्या नात्याचा अपमान आहे. निरागस बहीण-भावाच्या नात्याला किंमत लावण्याचे पाप या सरकारने केले आहे. आमचे दोन वीर बंधू दोन दिवसांपूर्वी म्हणाले की, आमचे लक्ष आहे, कुठली बहीण कुठे मतदान करते. म्हणजे यांच्या पोटातलं ओठावर आलं. सत्य कधी लपत नाही.”

यावेळी सुप्रिया सुळेंनी लाडकी बहीण योजनेवरून मतदान मागणाऱ्या नेत्यांवर टीका केली. मतदान केले नाही तर लाडकी बहीण योजनेतून दिलेले पैसे परत काढून घेऊ, असे विधान करणाऱ्या नेत्यांवर त्यांनी टीकास्र सोडले. यांचे बहिणीशी नाते प्रेमाचे नसून मतांशी जोडलेलं आहे. डिसेंबरमध्ये किती बुथवर किती महिलांची मतं मिळाली, हे पाहून लाडकी बहीण योजनेचे पुढचे पैसे दिले जाणार आहेत. “तुम्ही एका जरी बहिणीचे पैसे परत घेऊन दाखवाच, मग पुढे काय करायचे ते आम्ही पाहू”, असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी दिले.

हे ही वाचा >> हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सरकारवर हिंदू जनजागृती समितीची नाराजी; देवस्थान जमिनीच्या निर्णयावर टीका

महायुती सरकार त्यांच्या गलिच्छ राजकारणात नातीही ओढतील, अशी अपेक्षा नव्हती. पण तेही त्यांनी केले, अशीही टीका त्यांनी केली. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हणतात. पण आम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात लढत आहोत. तिथे अनिल परब आणि अनिल देसाई हे उत्तम कार्य करत आहेत, याबद्दल सुप्रिया सुळे यांनी या दोन नेत्यांचे कौतुक केले. लोकसभेत यश मिळवूनही आम्ही ही न्यायालयीन लढाई बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी लढत आहोत. मशाल आणि तुतारीला जनतेने आशीर्वाद दिलाच आहे, पण आम्ही ही तत्त्वांची लढाई आहे. त्यामुळे ही हक्कांची लढाई आम्ही शेवटपर्यंत लढत राहू, असे ठामपणे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.