महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार नाहीत, महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. असे वक्तव्य राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. छगन भुजबळ म्हणाले की ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हा केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात तयार झाला आहे. त्यामुळे देशातील ओबीसी भरडला जाऊ नये यासाठी पंतप्रधान आणि भारत सरकारने लक्ष घालून हा प्रश्न सोडवला पाहिजे. छगन भुजबळ यांनी या या विषयावर नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावं असं आवाहन केलं आहे. हा आता फक्त राज्याचा प्रश्न राहिला नसून आता संपूर्ण देशाचा प्रश्न आहे असं म्हणत त्यांनी आरक्षणाचा विषय भाजपाच्या कोर्टात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यावर भाजपाकडून अजून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा