मुंबई महानगरपालिकेकडूनही परिपत्रक जारी

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र तयारीची लगबग शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणेशोस्तव साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक मुंबईकर आपापल्या मूळ गावी जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासन निर्णयाच्या आधारे राज्यातील धार्मिक सण व उत्सवांच्या कालावधीत परीक्षांचे नियोजन करू नये, अशी सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी शाळांना दिल्या आहेत.

हेही वाचा >>> वायआरएफच्या भजन कुमारचा चेहरा आला समोर…

Noida Schools Bomb Threat
शाळेत जायचा कंटाळा आला म्हणून शाळेलाच बॉम्बने उडविण्याची दिली धमकी; नववीच्या विद्यार्थ्याला अटक
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
alandi illegal warkari educational institutes
आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांच्या तपासणीसाठी २० समित्यांची स्थापना; आज, उद्या तपासणी
hinganghat zilla parishad
वर्धा : निलंबित शिक्षक पुन्हा निलंबित…
ews certificate
ईडब्ल्यूएस विद्यार्थांना राज्याच्या नमुन्यातच प्रमाणपत्र द्यावे लागणार
Bopapur school, Bopapur teacher suspended ,
अजबच! दोन शिक्षक मारामारी करतात आणि विद्यार्थ्यास बदडतात, अखेर निलंबित ?
State government claims in High Court that there is no policy decision yet to start group schools Mumbai news
समूह शाळा सुरू करण्याचा अद्याप धोरणात्मक निर्णयच नाही; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा, जनहित याचिका निकाली
Letter of intent of unauthorized school in Dharavi cancelled
धारावीतील अनधिकृत शाळेचे इरादापत्र रद्द, शाळेतील ७०० विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन होणार

विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानेही धार्मिक सण व उत्सवांच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या कोणत्याही लेखी अथवा तोंडी परीक्षा घेऊ नयेत अशी सूचना सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त अनुदानित – विनाअनुदानित व इतर बोर्डाच्या शाळांना दिल्या आहेत. गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत विद्यार्थ्यांच्या लेखी, तोंडी अथवा प्रात्यक्षिक आदी कोणत्याही प्रकारच्या परीक्षा न घेण्यासाठी आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ठाकरे गटाच्या युवा सेनेने मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांना पत्र दिले होते.

Story img Loader