मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीची अजिबातच गरज नसून त्याच्या पाचपैकी केवळ एका कप्प्यात लहानशा दुरुस्तीची गरज आहे असे मत या जलाशयाची पाहणी करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. लवकरच या समितीमधील आठ जणांची बैठक होणार असून अंतिम अहवाल पालिका प्रशासनाला सादर केला जाणार आहे.

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यासाठी पालिकेने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने मलबार हिल जलाशयाची सोमवारी अंतर्गत पाहणी केली. या पाहणीसाठी जलाशयातील कप्पा क्रमांक एक पूर्ण रिक्त करण्यात आला होता. मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी पालिकेने आय. आय. टी. पवईचे चार प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. या समितीने ७ डिसेंबरला जलाशयामधील कप्पा क्रमांक २ ची अंतर्गत पाहणी केली होती. त्यानंतर काल सोमवारी
सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत या २ तासांच्या कालावधीत जलाशयामधील कप्पा क्रमांक १ ची अंतर्गत पाहणी केली. जलाशयाची पुनर्बांधणी करायची की दुरुस्ती करायची या प्रस्तावाचे पुनरावलोकन करुन या समितीने योग्य कार्यपद्धती सुचविणे अपेक्षित आहे.

Mumbais Water for All policy provided 7868 new water connections by December 2024
सर्वांसाठी पाणी धोरणाअंतर्गत १५ हजार अर्ज, ७८६८ जोडण्या दिल्या
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
dilapidated, bridge, Mumbai, traffic ,
मुंबईतील आणखी एक पूल जीर्ण, पुनर्बांधणीसाठी वाहतूक बंद
All-party leaders oppose recommendation to change formula for equitable water distribution in Jayakwadi dam
जायकवाडी समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र बदलण्याच्या शिफारशीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते
Thane Water Cut Supply Disrupted Due to Power Outage at Temghar Pumping Station
ठाणेकरांपुढे पाणी संकट; टेमघर पाणी पुरवठा केंद्रातील वीज यंत्रणेत बिघाड 
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम

हेही वाचा – महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरण : भाजपा आमदार तामिळ सेल्वन यांची शिक्षा उच्च न्यायालयाकडून स्थगित

या समितीमधील एक तज्ज्ञ अल्पा सेठ यांनी सांगितले की, जलाशयात वन ए, वन बी, वन सी आणि टू ए, टू बी असे एकूण पाच कप्पे आहे. या सर्व कप्प्यांची पाहणी आता पूर्ण झाली आहे. त्यापैकी सर्व कप्पे अतिशय सुस्थिती असून त्याच्या पुनर्बांधणीची अजिबातच गरज नसल्याचे आम्हाला वाटते. अन्य तज्ज्ञांचेही साधारण असेच मत आहे. मात्र आम्ही पुन्हा एकदा यावर चर्चा करू आणि मग अहवाल देऊ, असेही त्या म्हणाल्या. या जलाशयात कुठेही आम्हाला गळती किंवा ओलावा देखील फारसा दिसला नाही. १३५ वर्षांपूर्वी बांधलेले हे जलाशय आजकालच्या बांधकामापेक्षा खूपच चांगल्या दर्जाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. केवळ कप्पा क्रमांक वन सी मध्ये काही प्रमाणात गंज लागल्याचे त्या म्हणाल्या. त्याकरीता किरकोळ दुरुस्ती करावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – गोखले उड्डाणपुलाच्या कामामुळे लोकल फेऱ्यांवर परिणाम

जलाशयाच्या स्थितीचे वर्णन करताना त्या म्हणाल्या की, एखाद्या रुग्णाला आजाराच्या थोड्याफार कुरबुरी असतील तर त्याला उपचारांची गरज असते. इथे मात्र थेट अवयव प्रत्यारोपणाचा प्रस्ताव असल्यासारखे पालिकेने पुनर्बांधणीचा प्रस्ताव ठेवला असल्याचीही टीका त्यांनी केली आहे.

Story img Loader