लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. शुक्रवारी (८ नोव्हेंबर) नाशिकमध्ये राज्यात सर्वांत कमी १४.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात पुढील पाच दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
La Nina, The rainy season, climate patterns, global phenomenon
विश्लेषण : ‘ला निना’चा पावसाळी मुहूर्त चुकला! आता कडाक्याच्या थंडीबरोबर गारपिटीचीही शक्यता?
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून थंड वारे राज्यात येत आहेत. त्यामुळे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत किमान तापमानात घट झाली आहे. शुक्रवारी नाशिकमध्ये राज्यात सर्वांत कमी १४.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. नगरमध्ये १५.७, जळगावात १५.७, महाबळेश्वरमध्ये १५.२ आणि पुण्यात १६.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडील वाऱ्याचा प्रवाह पुढील पाच दिवस कायम राहण्याचा अंदाज असल्यामुळे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात पुढील पाच – सहा दिवस थंडी राहण्याचा अंदाज आहे.

आणखी वाचा-न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा

राज्याच्या अन्य भागात थंडी वाढली आहे. मराठवाड्यात १६.५ ते १८ अंश सेल्सिअस, विदर्भात १७.५ ते १९.५ अंश सेल्सिअस आणि किनारपट्टीवर १९.६ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमान होते. शुक्रवारी कुलाब्यात २५.२ तर सांताक्रुजमध्ये २२.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील आठवडाभर राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही. ढगाळ हवामान निर्माण होण्याची शक्यता नाही, त्यामुळे तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे.

आणखी वाचा-वाढत्या इन्फ्लूएन्झापासून बचावासाठी ‘एसएच २४’ लस घ्या! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश

कमाल तापमानातही घट

राज्यभरात किमान तापमानात घट झालेली आहे, तशीच कमाल तापमानातही घट झाली आहे. किनारपट्टीवर ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात ३० ते ३२ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात ३१ ते ३४ अंश सेल्सिअस आणि विदर्भात ३१ ते ३३ अंश सेल्सिअस दरम्यान कमाल तापमान होते. मुंबईत कमाल तापमानात फार घट झाली नसली तरीही हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Story img Loader