स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी मी गुजराती समाजावर नाही तर, नरेंद्र मोदींच्या विकासावर टिपण्णी केली असे त्यांनी ट्विटरवरुन गुजराती समाजावर केलेल्या वादग्रस्त ट्विटवर आपले स्पष्टीकरण दीले आहे. ते आज शनिवार पत्रकार परिषदेत बोलत होते.
नितेश राणे म्हणाले, मी कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत, तसा माझा उद्देश नव्हता. राज्याविषयीच्या अभिमानामुळे ट्विटरवर वक्तव्य केले. गुजरात जर इतके प्रगतशील राज्य असेल मग गुजराती मुंबईत का? गुजरातमध्ये विकास झालेला नाही. विकासाचे खोटे स्वरुप तेथे उभारले गेले आहे. गुजरातमध्ये विकास नसल्याने गुजराती मुंबईत आहेत. असेही नितेश राणे म्हणाले.
विधिमंडळ अधिवेशनात नितेश राणे यांच्या मतांवर भाजपच्या आमदारांनी जोरदार आक्षेप घेतला होता, आणि कारवाईची मागणी केली. त्याचवेळी विधानसभा उपाध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गणेश नाईक यांना दिले आहेत. नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणे आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Aug 2013 रोजी प्रकाशित
गुजरातींवर नव्हे; मोदींच्या विकासावर टीका- नितेश राणे
गुजरात जर इतके प्रगतशील राज्य असेल मग गुजराती मुंबईत का? गुजरातमध्ये विकास झालेला नाही. विकासाचे खोटे स्वरुप तेथे उभारले गेले आहे.
First published on: 03-08-2013 at 12:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not to gujarati people i criticise gujrat government nitesh rane