गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांच्या घरांच्या प्रश्नी राज्य सरकार उदासीन असल्याचा आरोप करत कामगारांनी आता घरांसाठीचा लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ११ मार्च रोजी गिरणी कामगार आणि त्यांचे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरावर मोर्चा काढणार आहेत. दीड लाख गिरणी कामगारांना कसे, कुठे आणि कधी घर देणार याबाबत राज्य सरकारने अजूनही कोणतेही ठोस उत्तर दिलेले नाही.

हजारो विजेते-गिरणी कामगार किंवा वारसदारांना घरांचा ताबा देण्यात आलेला नाही. शेकडो विजेते कामगार गृहकर्जाचा समान मासिक हप्ता भरत आहेत. एकूणच राज्य सरकार आणि म्हाडा कामगारांच्या घरांच्या प्रश्नी प्रचंड उदासीन असल्याचा आरोप कामगार संघटनांकडून केला जात आहे. याच अनुषंगाने आता घरांसाठीचा लढा तीव्र करण्याचा निर्णय सर्व श्रमिक संघटनांनी घेतला आहे.

interfaith couple legal protection by maharashtra government
आता बिनधास्त करा प्रेमविवाह! ,सरकार देणार ‘सेफ हाऊस’
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
pune city real estate projects Housing projects
सरकारच्या एका चुकीच्या निर्णयामुळे हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांना खो बसतो तेव्हा…
Expedite work of houses under PMAY in Maha says cm fadnavis
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Parliament Budget Session
Parliament Budget Session : “सरकार मृतांची माहिती का उघड करत नाही?”, कुंभमेळ्यातील घटनेचे राज्यसभेत पडसाद, विरोधकांचा सभात्याग
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
ST seeks UPI solution to holiday money dispute Mumbai news
सुट्या पैशांच्या वादावर एसटीकडून ‘यूपीआय’चा तोडगा; प्रतिसादामुळे उत्पन्नात दुप्पट वाढ

हेही वाचा – “दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी असल्याने…”; संजय राऊतांचं CM शिंदेंवर टीकास्र!

हेही वाचा – गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी, हैद्राबादमधील व्यक्तीविरोधात गुन्हा

करीरोड येथे रविवारी झालेल्या बैठकीत संघटनेने १२ मार्चला मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बी. के. आंब्रे यांनी दिली. संघटनेने १८ जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर, वर्षावर मोर्चा काढला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन यावर मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन कोरडेच ठरले आहे. त्यामुळे, मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही आंब्रे यांनी सांगितले.

Story img Loader