मुंबई : २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना करोनामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर झाला आहे. परिणामी काही विद्यार्थ्यांना परीक्षेत अपयशाचा सामना करावा लागता होता. ही बाब लक्षात घेत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या आणि पहिली परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेल्या एमबीबीएस विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – Mumbai Video : हिवाळ्यात मुंबईच्या सौंदर्यात पडते आणखी भर! तुम्ही हिवाळ्यात मुंबई पाहिली का?

loksatta anvyarth quality of school students has deteriorated clear from the asar survey
अन्वयार्थ: कोविडोत्तर निरीक्षणांच्या इयत्ताबदलाचा ‘असर’!
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
BMC cbse and icse school 10th class exams news in marathi
पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेचे विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार, पालिकेच्या शिक्षण विभागाची कसोटी
Success Story : इच्छाशक्ती! कोट्यावधीची नोकरी सोडून निवडले आयएएस पद; वाचा देशात पहिला येणाऱ्या कनिष्क कटारियाची गोष्ट
strict action against students if found with a mobile phone in an exam
खबरदार ! परीक्षेत विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळल्यास आता इतके वर्ष…
state education board decision tenth twelth examination
दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत राज्य मंडळाचा मोठा निर्णय… आता परीक्षेतील गैरप्रकारांना चाप
Bhuse explained that the results of the 10th and 12th examinations will also be announced by May 15
दहावी, बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी? शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
Why is there a conflict between two groups of MPSC over the demand for increase in seats
जागावाढीच्या मागणीवरून ‘एमपीएससी’च्या दोन गटांमध्ये संघर्ष का सुरू आहे? ही आहेत कारणे

हेही वाचा – ‘महारेरा’च्या कारवाईच्या बडग्यानंतर विकासकांना जाग

करोनामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रुग्णसेवा करण्याबरोबरच महामारीचाही सामना करावा लागत होता. त्यामुळे अनेकांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झाले होते. याचा परिणाम विद्यार्थांच्या अभ्यासावर झाला. त्यामुळे अनेक विद्यार्थी एमबीबीएसच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाले होते. ही बाब लक्षात घेता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या आणि एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी एक अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे करोनामुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची एक संधी मिळणार आहे. ही संधी फक्त एकदाच दिली जाणार असल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे पदवी वैद्यकीय शिक्षण मंडळाचे संचालक शंभु शरण कुमार यांनी स्पष्ट केले.

Story img Loader