लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नालेसफाईची कामे हाती घेतली आहेत. नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याबाबत महानगरपालिकेने जाहीर केलेली आकडेवारी खोटी असून, आतापर्यंत नालेसफाईची केवळ २५ ते ३० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. नालेसफाईच्या कामात महानगपालिकेकडून निष्काळजीपणा केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Loksatta shaharbat Vasai suffers from heavy dust pollution
शहरबात: धूळ प्रदूषणाने वसईची घुसमट …
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Mumbaikars supplied with only clean disinfected water claims mumbai municipal administration
मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेल्या स्वच्छ पाण्याचाच पुरवठा, महापालिका प्रशासनाचा दावा
bmc plans to concrete all roads but residents oppose concreting in their area
आम्हाला काँक्रिटिकरण नको, वांद्रे आणि मरीन ड्राईव्हच्या राहिवाशांची मागणी
ग्रामीण भागात घरफोडी करणारा चोरटा गजाआड; चोरट्याकडून १६ लाखांचा ऐवज जप्त
dombivli municipal corporation loksatta news
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात पालिकेच्या स्वच्छता दुतांच्या उपद्रवाने नागरिक हैराण
Cash theft , four wheeler, Viman Nagar area,
पुणे : मोटारीची काच फोडून साडेदहा लाखांची रोकड चोरी, विमाननगर भागातील घटना
What are measures taken by Mumbai Municipal Corporation to prevent pollution Why is pollution not reducing
प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचे उपाय कोणते? तरीदेखील प्रदूषण कमी का होत नाही?

पश्चिम उपनगरातील साऊथ एव्हेन्यू नगर – गझदर बांध नाला, पवन हंस नाला व एस.एन.डी.टी. नाला, गजधर बांध पंपिंग स्टेशन, मिलिनेयम क्लबजवळील इर्ला नाला, मोगरा नाला, मेघवाडी नाला या नाल्यांची शेलार यांनी शुक्रवारी पाहणी केली. ‘राहुल नगर नाल्याच्या सफाईचे काम झालेले नाही. गझदरबंध नाल्यात आजच जेसीबी उतरवून गाळाचा अंदाज घेण्यात आला आहे. तर गझदरबंध पंपिंग स्टेशनसमोर गाळाचे ढीग साचलेले आहेत. एसएनडीटी नाल्याचे कामही नुकतेच सुरू झाले असून, बेस्ट वसाहत नाल्यात वनस्पती उगवलेल्या दिसत आहे. प्रत्यक्षात नालेसफाईची केवळ २५ ते ३० टक्के कामे झाली असून, ७० ते ८० टक्के नालेसफाई झाल्याचा महानगरपालिकेचा दावा खोटा आहे’, असे शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा… मुंबई: प्रवाशाचा मोबाइल चोरणाऱ्या आरोपीला रंगेहात अटक

गेल्या अनेक वर्षांपासून पावसाच्या पाण्याचा नीट निचरा व्हावा ही मुंबईकरांची अपेक्षा आहे. मात्र गेली २५ वर्षे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. महानगरपालिका कंत्राटदारांच्या जीवावर सर्व दावे करीत आहे. नालेसफाईच्या २८० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या कामांसाठी नियुक्त केलेले कंत्राटदार हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असून, त्यांच्यावर आमचा विश्वास नाही, असेही ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्यावरही शेलार यांनी टीका केली.

Story img Loader