मुंबई : गेल्या वर्षभरात ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरून दोन कोटी मुंबईकरांनी प्रवास केला असून या दोन्ही मेट्रो मार्गिकांना प्रवाशांकडून पसंती मिळत आहे. त्यामुळेच आजघडीला दर दिवशी सरासरी एक लाख ६० हजार प्रवासी या मार्गिकांवरून प्रवास करीत आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या प्रकल्पातील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांतील पहिला टप्पा २ एप्रिल २०२२ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला असून याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या दोन्ही मार्गिकांचा दुसरा टप्पा १९ जानेवारी २०२३ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. त्यानंतर या दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्या असून आता या मार्गिकांना वाढता प्रतिसाद मिळत असल्याचा दावा एमएमआरडीए आणि महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) केला आहे. या दोन्ही मार्गिकांवरून एप्रिल २०२२ ते एप्रिल २०२३ दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या दोन कोटीवर पोहोचली आहे.

Navi Mumbai Metro update Belapur Pendhar line Metro speed
नवी मुंबई मेट्रो सुसाट, लवकरच बेलापूर-पेणधर मेट्रोची ताशी ६० प्रति किलोमीटर वेगाने धाव
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Metro Line 8 to Link Mumbai and Navi Mumbai Airports
मुंबई विमानतळ ते थेट नवी मुंबई विमानतळ…कशी असेल मेट्रो – ८? खासगी- सार्वजनिक उभारणीचे कोणते फायदे?
MSRTC on hike in bus fares review in marathi
विश्लेषण : एस.टी. भाडेवाढ अपरिहार्य होती का?
Chhatrapati Sambhajinagar, water , arrears ,
छत्रपती संभाजीनगरमध्ये नळजोडणीची १२१ कोटींची थकबाकी
ST hiked passenger fares by around 15 percent now avdel tethe Pravas pass fares also increased from 45 to 66 percent
‘एसटी’च्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेला प्रवासी मिळणार कसे?.. पासच्या किमती…
shani snan mahakumbh ticket price hike
विदेश दौऱ्यापेक्षा प्रयागराजचा विमान प्रवास महागला, तिकीटे ५०,००० पार; कारण काय? सरकार काय करणार?
mahakumbh 2025
Maha Kumbh 2025 : पवित्र कुंभस्नानासाठी ४८ लाख भाविकांचा ट्रेनने प्रवास, मौनी अमवास्येकरता रेल्वेकडून खास नियोजन!

पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर या दोन्ही मार्गिकांवर दर दिवशी मेट्रोच्या १७२ फेऱ्या होत होत्या. दिवसाला सरासरी ३० हजार ५०० प्रवासी मेट्रोतून प्रवास करीत होते. जानेवारीमध्ये ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दुसरा टप्पा सुरू झाला आणि या मार्गिकांवर मेट्रो पूर्ण क्षमतेने धावू लागल्या. त्यानंतर प्रवासी संख्येत प्रचंड वाढ झाली. त्यामुळेच प्रति दिन प्रवासी संख्या ३० हजार ५०० वरून एक लाख ६० हजारावर पोहोचली. वर्षभरात प्रवासी संख्येने दोन कोटीचा पल्ला पार केला आहे. त्याच वेळी ‘मुंबई-१’ या एकात्मिक तिकीट प्रणाली कार्डलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत ८१ हजार कार्ड विकली गेले आहेत.

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांमधून आतापर्यंत दोन कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. ‘मुंबई-१’ कार्डलाही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यापुढेही विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

एस. व्ही. आर. श्रीनिवास महानगर आयुक्त आणि अध्यक्ष, एमएमएमओसीएल

Story img Loader