मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा बहुप्रतिक्षित मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी – मरिन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिकेवरून गेल्या १२ दिवसांमध्ये तब्बल सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला. त्यातही सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत या मार्गावरून जाणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त होती.

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी – मरिन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिका १२ मार्चपासून सर्वसामान्यांसाठी खुली झाली. बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा या मार्गाबाबत मुंबईकरांना प्रचंड उत्सुकता होती. या मार्गावरून सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत वाहतूक सुरू असते. तसेच शनिवारी आणि रविवारी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असतो. दुसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी हा मार्ग बंद ठेवण्यात येतो.

mahakumbh 2025
Maha Kumbh 2025 : पवित्र कुंभस्नानासाठी ४८ लाख भाविकांचा ट्रेनने प्रवास, मौनी अमवास्येकरता रेल्वेकडून खास नियोजन!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
eknath shinde and devendra fadanvis
सागरी किनारा मार्ग वाहतुकीसाठी खुला; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी लोकार्पण
Finance Minister approves purchase of 25000 privately owned st buses in five years
गाव तेथे नवी एसटी धावणार; पाच वर्षांत २५ हजार स्वमालकीच्या ‘लाल परी’ बस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता
coastal road issue environmentalists oppose giving part of land close to sea to breach candy
कोस्टल रोड मार्गात नवा पेच; भराव भूमीचा भाग ब्रीच कँडीला देण्यास पर्यावरणवाद्यांचा विरोध
Bandra Worli sea bridge coastal raod will be inaugurated by CM Fadnavis on Republic Day
सागरी किनारा मार्ग पूर्णक्षमतेने सुरू होणार, सागरी किनारा आणि वरळी वांद्रे सागरी सेतू जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी लोकार्पण
Major action against sand smugglers Revenue Department destroys 15 boats
बुलढाणा : वाळू तस्करांविरोधात मोठी कारवाई, महसूल विभागाने १५ बोटी केल्या उद्ध्वस्त
Regional Transport Department Officer Hemangini Patil claims about the reduction in accidents thane news
उपाययोजनांमुळे डिसेंबर महिन्यात अपघातामध्ये घट; प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी हेमांगिनी पाटील

हेही वाचा…आवश्यक मंजुरी न मिळाल्यास मोक्का लागू नाही, आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन मागण्याचा अधिकार

आतापर्यंत या मार्गिकेवरून तब्बल २ लाख २५ हजार ५५८ वाहनांनी प्रवास केला. यामध्ये सकाळी १० नंतर वाहनांची संख्या सर्वाधिक असते. सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत सर्वाधिक वाहने या मार्गावरून जातात. नंतर पुन्हा दुपारी ३ ते ४ या वेळेतही वाहनांची संख्या अधिक असते.

सागरी किनारा मार्गावर येण्यासाठी वरळीतील बिंदू माधव ठाकरे चौक, रजनी पटेल चौक आणि भुलाबाई देसाई रोड येथून प्रवेश करता येतो. तसेच अमरसन्स उद्यान, भुलाबाई देसाई रोड आणि मरिन ड्राईव्ह येथे बाहेर पडण्यासाठी मार्ग आहेत. तीन प्रवेशमार्ग असल्यामुळे बोगद्यातून मरिन ड्राईव्ह येथे बाहेर पडणाऱ्या वाहनांची मोजणी करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा…ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमोल कीर्तिकर यांना पुन्हा समन्स

सागरी किनारा मार्गावर सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत प्रवेश दिला जात आहे. मात्र, वरळी सी फेस परिसरातील बिंदू माधव ठाकरे चौकातील प्रवेश मार्गावर संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होते. संध्याकाळच्या वेळी उपनगरात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. त्यामुळे वरळीतील या प्रवेशमार्गावरून संध्याकाळी ५ पर्यंतच प्रवेश दिला जातो.

Story img Loader