मुंबईत काल पावसाने अक्षरशा थैमान घातलं. तीन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडली. चेंबूर भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला, तर विक्रोळीतही ३ लोकांचा मृत्यू झाला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची आज पाहणी केली. ”ही एक नैसर्गिक घटना जरी असली, तरी एवढा पाऊस पडणं अनैसर्गिक आहे. मुंबईत काल रात्री झालेला पाऊस भितीदायक होता. समुद्र किनाऱ्यावरील भागांना धोका जास्त आहे.”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

काळरात्र! चेंबूरमध्ये दरड कोसळून १७ ठार; तर विक्रोळीत दुमजली इमारत कोसळली, ६ जणांचा मृत्यू

Maternity Benefit Act 1961, maternity benefits, working women,
गर्भधारणा लाभ कायदा हा नोकरीतील कंत्राटापेक्षा वरचढच!
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
Seven hundred women cheated, Mudra loan, case against a woman,
मुद्रा लोनच्या नावाखाली सातशे महिलांना २५ लाखांस गंडविले, सोलापुरात भामट्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
centre likely to approve gst exemption on senior citizen health insurance premiums
आरोग्यविम्यावरील जीएसटीत सवलत; मंत्रिगटाचा प्रस्ताव; अंतिम निर्णय परिषद घेणार
Father and son imprisonment, imprisonment beat police,
मुंबई : कर्तव्या बजावणाऱ्या पोलिसांना मारहाण करणे महागात, पिता-पुत्राला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा
Jayant Patil on Ladki Bahin Yojana
सत्तेत आल्यास आघाडी सरकार ‘लाडकी बहीण योजना’ चालू ठेवणार; नेत्यांच्या टीकेनंतर जयंत पाटलांकडून निर्वाळा
Loksatta anvyarth N Chandrababu Naidu ED Skill development scam
अन्वयार्थ: तेव्हा भ्रष्ट, आता स्वच्छ…
tirupati laddu quality improved devotees appreciate says cm chandrababu naidu zws
तिरुपती लाडूच्या गुणवत्तेत सुधारणा! भाविकांकडून प्रशंसा : मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा दावा

चेंबूर नंतर विक्रोळीतील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी सांगितले की, तीन ठिकाणी काल दरडी कोसळल्या आहेत. आपण सर्वांनीच पाहिलं की काल कशाप्रकारे पाऊस झाला. अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण २०० मिमी पेक्षा जास्त होतं. विक्रोळीत दुर्घटना घडली त्या ठिकाणी एक-दोन वर्षांपूर्वी जी संरक्षक भिंत उभारण्यात आली होती, त्यामुळे कमी नुकसान झालं आहे. मात्र दुर्घटना तर घडलीच आहे. सरकारकडून नुकसानग्रस्ताना सर्वोतोपरी मदत पुरवली जात आहे.

तसेच, ही घटना एक नैसर्गिक आपत्ती होती. भिंतीच्यावरून माती आणि पाणी आले. भिंत आरसीसीने बनविली होती परंतु पाण्याचे जोर काही थांबवू शकली नाही. आम्ही मुंबईतील बेकायदेशीर घरं आहेत, त्यांचा आढावा घेतला जात आहे. प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. अशी देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी माहिती दिली.

तर, धोकादायक परिस्थितीत राहणाऱ्या लोकांना तत्काळ अन्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा आम्ही निणर्य घेऊ. बीएमसी कडून या दुर्घटनेची चौकशी केली जाईल. अशी माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक; मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर!

मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. पालिका आयुक्तांकडून मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती घेतली. एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरु ठेवावे व जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली असून जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत.