ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसांनी म्हणजे ६ जून रोजी विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका कनिष्ठ महाविद्यालयात मिळतील. गुणांची पडताळणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर १७ जूनपर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे शुल्कासह अर्ज करावा लागेल. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य आहे. ऑक्टोबर, २०१३ च्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे सूचना देण्यात येतील.
सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल उंचावण्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत परीक्षेला पुन्हा बसण्याची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना ऑक्टोबर, २०१३ व मार्च, २०१४ अशा दोन संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत दिली जाईल. त्यासाठी ऑनलाइन निकालानंतर तात्काळ अर्ज करता येईल. १९ जूनपर्यंत हे अर्ज स्वीकारले जातील. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही छायाप्रत मिळविणे बंधनकारक आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
मुंबई विभागीय मंडळातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३० मेपासून सकाळी ११ वाजल्यापासून २७८९३७५६ या हेल्पलाइनवर संपर्क साधून आपल्या शंकांचे निरसन करून घेता येईल. ५ जूनपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत ही हेल्पलाइन कार्यरत  राहील.
याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय मंडळस्तरावर समुपदेशांची २४ तास हेल्पलाइन सुविधाही देण्यात येणार आहे.

समुपदेशकांचे नाव आणि भ्रमणध्वनी पुढीलप्रमाणे –
वि. वि. शिंदे :९८२००७३७८२,
ए. डी. सरोदे :९३२२५२७०७६,
स्मि.न.शिपुरकर:९८१९०१६२७०,
संजय चौधरी :९८६९०२२२२४,
मुरलीधर मोरे:९३२२१०५६१८,
विकास जाधव : ९८६७८७४६२३, ९९६७९३७१११,
बी. के. ह्य़ाळीज:९४२३९४७२६६,
अनिलकुमार गाढे:९९६९०३८०२०,
चं. ज. मुंढे :९८६९३०७६५७,
ज. पा. घाडगे :९८६७९०६१२९.