मुंबई : पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर स्थानकातून धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३१ वर्षीय प्रवाशाला प्राण गमवावे लागले. धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात प्रवाशाचा तोल गेला आणि तो लोकल आणि स्थानकामधील मोकळ्या जागी अडकला. लोकलबरोबर तो फरफटत काही अंतरावर गेला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला.

राम मंदिर रेल्वे स्थानकात सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास कामावरून परतीचा प्रवास करताना फलाट क्रमांक ३ वरून प्रवासी राहुल थोरवत (३५) धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच वेळी लोकलचा दांडा हातून सुटला आणि राहुलचा तोल गेला. लोकल आणि स्थानकातील मोकळ्या जागी तो पडला. त्यानंतर काही अंतरापर्यंत लोकलबरोबर तो फरफटत गेला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली.

Considering rush of passengers during festive season Railways decided to start new trains in nagpur ppd
आनंदवार्ता! ‘या’मार्गावर नवीन रेल्वे धावणार; मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना…
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
person injured while tyring to alight from local traina at dombivli station
डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकलमधून, रेल्वे मार्गात उतरताना प्रवासी जखमी
Panvel to Nanded special trains on the occasion of Diwali 2024
दिवाळीनिमित्त पनवेल – नांदेड विशेष रेल्वेगाड्या
metro services
‘मेट्रो ३’ विस्कळीत, दोन दिवसांतच तांत्रिक अडचणी
Attack on passengers at Nagpur railway station Two killed and two injured
माथेफिरूचे भयंकर कृत्य… नागपूर रेल्वे स्थानकात प्रवाशांवर हल्ला; दोन ठार, दोघे जखमी
Konkan Railway, Konkani passengers, Konkan,
कोकणी प्रवासी कायम दुर्लक्षित
mumbai heavy rain local down
“माझ्या बाळाला जेवण भरवायचं आहे, प्लीज लोकल सुरू करा”, स्टेशनवर खोळंबलेल्या महिला प्रवाशाची मोटरमनला कळकळीची विनंती!

हेही वाचा >>> शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

नालासोपारा येथे राहणारा राहुल गेल्या दहा वर्षांपासून सुरक्षा रक्षकाची नोकरी करीत होता. राहुल मूळचा कोल्हापूरचा होता. नोकरीनिमित्त मुंबईत आला होता. गेल्या दोन वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. चार वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन बहिणी असा परिवार आहे.