मुंबई: उत्तर मुंबईच्या लोकसेवकाची जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात आली आहे.  विकसित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी उत्तर मुंबईला ‘उत्तम मुंबई’ बनविण्याचा आपला निर्धार आहे. त्यासाठी या मतदार संघातील झोपडपट्टी पुनर्विकासाच्या माध्यमातून लोकांना त्याच ठिकाणी कायमस्वरूपी हक्काचे घर,  भव्य मल्टी स्पेशालिटी रुग्णालय बांधण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे आश्वासन उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी मतदारांना दिले. काँग्रेसनेते राहुल गांधी वायनाडमधून हरणार असून त्यांनी  आपल्याविरोधातही निवडणूक लढविण्याची  हिंमत दाखवावी असे आव्हानही गोयल यांनी दिले.

 उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या गोयल यांनी या मतदार संघाच्या विकासाची आपली योजना मतदारांसमोर मांडली. यावेळी त्यांनी कांदा निर्यातीच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि संविधान बदलाच्या मुद्दय़ावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली. मुंबईतील शिक्षण, व्यवसाय आणि भाजपच्या माध्यमातून आपण मुंबई जवळून पाहिली आणि अनुभवली आहे. वंदे भारत रेल्वे आणि मेट्रो रेल्वेने मुंबई आणि देशाचा रेल्वे प्रवास सुकर केला आहे. तसेच आपल्या रेल्वे मंत्रीपदाच्या कार्यकाळात १९ महिने शून्य मृत्यूसह सुरक्षित रेल्वे प्रवासाची नोंद झाली असून त्याचे  समधान आहे. विकसित भारताचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवण्याचा आपला निर्धार आहे. 

cm Eknath Shinde inspects landslide prone area in ghatkopar
मुंबई लवकरच दरड अपघात मुक्त करणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; घाटकोपरच्या आझाद नगरमध्ये दौरा
Mumbai, air pollution, traffic,
मुंबई : रहदारीमुळे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काय कारवाई केली ? तपशील सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
State government assurance of not pushing OBC reservation
‘ओबीसी’ आरक्षणास धक्का न लावण्याचे आश्वासन
Rohit Pawar, Ajit Pawar,
पुणे जिल्ह्याकडे पालकमंत्र्यांचे लक्षच नाही, रोहित पवारांचा पालकमंत्री अजित पवारांना टोला
Solapur, irrigation, Ujni water distribution,
सोलापूर : उजनी पाणी वाटपात शिस्त आणून सिंचन वाढविण्यास प्राधान्य, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा मनोदय
vishalgad animal sacrifice marathi news
विशाळगड येथे बकरी-ईद, उरूसनिमित्त कुर्बानीस परवानगी, आदेशाचा विपर्यास केल्यावरून उच्च न्यायालयाकडून स्थानिक प्रशासनाची कानउघाडणी
amit shah
शून्य दहशतवाद, वर्चस्वासाठी नियोजन करा; जम्मूतील धोरणांबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सक्त सूचना
sassoon peon accepted bribe in the premises of juvenile justice board
ससूनमधील शिपायाने बाल न्याय मंडळाच्या आवारात लाच स्वीकारली, सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांच्या ताब्यात

हेही वाचा >>>पत्रकार महिलेला धमकावल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

येथील लोकांच्या  सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यास आपले प्राधान्य असेल अशी माहिती त्यांनी दिली. उत्तर मुंबईतील जनतेचे चांगले आरोग्य हा चांगल्या पर्यावरणाशी निगडित विषय आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त उत्तर मुंबई हेच उत्तम मुंबईचे प्रतीक ठरणार असून उत्तर मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचेही गोयल यांनी सांगितले.

वायनाड लोकसभा मतदारसंघातून पराभूत  होण्याच्या धास्तीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता अन्य  मतदारसंघाचा शोध सुरू केला असून त्यांनी चार पाच ठिकाणी लढावे. आपल्या विरोधातही लढावे असे आव्हान त्यांनी दिले. तसेच आजवर काँग्रेसनेच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला असून त्यांना निवडणुकीत हरवण्यासाठी काँग्रसनेच कारस्थाने केली. पण मोदींच्या हातातच बाबासाहेबांचे संविधान सुरक्षित असल्याचा दावाही गोयल यांनी केला.