मुंबई : वांद्रे रेक्लमेशन परिसरातील व्यावसायिक क्षेत्र म्हणून विकसित करण्यात येणारा भूखंड हा सागरी किनारा नियंत्रण (सीआरझेड) क्षेत्रात येत नाही. त्यामुळे, हा भूखंड व्यावसायिक क्षेत्र म्हणून विकसित केला जाऊ शकतो, असा दावा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयासह अदानी रियाल्टीने उच्च न्यायालयात केला आहे, सीआरझेड नियमावलीनुसार, भराव टाकून तयार करण्यात आलेल्या भूखंडावर विकासकामांना परवानगी देता येत नाही, असा दावा करून वांद्रे रिक्लेमेशन येथील भूखंड व्यावसायिक क्षेत्र म्हणून विकसित करण्याच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) निर्णयाला पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना आणि स्थानिकांच्या एका संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच, सीआरझेड नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने या भूखंडावर कोणत्याही विकासास प्रतिबंध करण्याचे आणि या जागेला हरितपट्टा म्हणून पुनर्संचयित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर आपली बाजू मांडणारे प्रतिज्ञापत्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि अदानी रियाल्टीने नुकतेच न्यायालयात दाखल केले. त्यात हा भूखंड सीआरझेड क्षेत्रात येत असल्याच्या याचिकाकर्त्यांच्या दाव्याचे प्रामुख्याने खंडन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा