मुंबई : जोगेश्वरीतील पीएमजीपी वसाहतीतील १७ इमारतींचा पुनर्विकासासाठी म्हाडाने विकासकाची नियुक्ती करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. तीनदा मुदतवाढ देऊनही निविदा सादर झालेली नाही. यामुळे या इमारतींचा पुनर्विकास लांबणीवर पडला आहे.

केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत मुंबईत अनेक ठिकाणी पीएमजीपी वसाहती उभारण्यात आल्या आहेत. जोगेश्वरी येथील २७,७२५ चौरस मीटर क्षेत्रफळावर १९९० मध्ये पीएमजीपी वसाहत बांधण्यात आली. यात चार मजली १७ इमारती आहेत. त्यात ९४२ निवासी, तर ४१ अनिवासी गाळे आहेत.

construction of illegal building near kdmc h ward office
कडोंमपाच्या ह प्रभाग कार्यालयाजवळ बेकायदा इमारतीची उभारणी; सामासिक अंतर न सोडल्याने परिसरातील सोसायटीतील रहिवासी अस्वस्थ
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
maharashtra govt gave responsibility to ias officers for developing mmr as a growth hub
‘एमएमआर’च्या विकासाची जबाबदारी नोकरशहांकडे! राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी केंद्राची सूचना अमलात
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 
136 artificial ponds for immersion build in navi mumbai
नवी मुंबईत यंदा १३६ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती; जलप्रदूषण टाळण्याचे आयुक्तांचे आवाहन
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
Rasta Roko, Nashik, Sakal Adivasi community, PESA sector, recruitment, Forest Land Act, Panchayats Extension to Scheduled Areas Act
पेसा भरतीसाठी वणीत रास्ता रोको, वाहतूक विस्कळीत

हेही वाचा >>> ‘धारावी’साठी आणखी तीन जागांची मागणी

या वसाहतीतील इमारती अल्पावधीतच जीर्ण झाल्या आहेत. सोसायटीने ‘श्रीपती समूहा’ची नियुक्ती केली. पण या विकासकाने पुनर्विकास काही मार्गी लावला नाही. दहा वर्षांच्या कालावधी पुनर्विकास न करणाऱ्या विकासकाची नियुक्ती सोसयाटीने रद्द केली.

नियुक्ती रद्द झाल्यानंतर म्हाडाने इमारतींची संरचनात्मक तपासणी केली. या तपासणी सर्वच इमारती अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले आणि त्यांचा तात्काळ पुनर्विकास करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा >>> मध्य मुंबईत ठणठणाट; वरळी, लोअर परळ, करीरोड भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा

संरचनात्मक तपासणी अहवाल सादर झाल्यानंतर मुंबई मंडळाने रहिवाशांना संक्रमण शिबिरातील गाळे उपलब्ध करून दिले. काही जण संक्रमण शिबिरात गेले असले तरी अजूनही मोठ्या संख्येने रहिवासी या इमारतीत राहत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंडळाने इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकासकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. मात्र, निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. तिसऱ्या मुदतवाढीनुसार १९ ऑगस्ट ही निविदा सादर करण्याची अंतिम तारीख आहे.