लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : बेस्ट उपक्रम प्रशासनाने दक्षिण मुंबईतील १० लाख ३० हजार वीज ग्राहकांचे जुने मीटर काढून त्याजागी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जोपर्यंत नव्या मीटर योजनेविषयीचे मुंबईकरांचे संभ्रम दूर होत नाहीत, तोपर्यंत वीज मीटर बसवण्याच्या कामास स्थगिती द्यावी अन्यथा जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा समाजवादी पक्षाचे सरचिटणीस व आमदार रईस शेख यांनी दिला आहे.

Mumbai Municipal Corporation will conduct a survey of sanitation workers Mumbai
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचे महापालिका सर्वेक्षण करणार; विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
headmaster, schools, Education Department,
गुरूवारी मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर; हवामान विभागाच्या रेड अलर्टनंतर प्रशासनाचा निर्णय
Mumbai Municipal Corporation, Clerk Post Recruitment,
लिपिक पदाच्या भरतीसाठी मुंबई महानगरपालिकेची पुन्हा जाहिरात, प्रचंड विरोधानंतर ‘ही’ अट वगळली
asiatic society mumbai news
मुंबई: “२२० वर्ष जुनी एशियाटिक सोसायटी ताब्यात घ्या”, कर्मचाऱ्यांची मोदी सरकारकडे मागणी!
Separate compartment, senior citizens,
दोन वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा, एका मालडब्याचे ज्येष्ठांसाठीच्या डब्यात रूपांतर, रेल्वे प्रशासनाची उच्च न्यायालयाला माहिती
Refund if higher salary demand guarantee from ST employees
मुंबई : जास्त वेतन आल्यास परत द्या, एसटी कर्मचाऱ्यांकडून हमीची मागणी
95 percent increase in cost of Versova Bay Madh connecting project ravi raja Mumbai news
वर्सोवा खाडी – मढ यांना जोडणाऱ्या प्रकल्पाच्या खर्चात ९५ टक्क्यांनी वाढ; विरोधी पक्ष नेता रवी राजा यांचा आरोप

आमदार रईस शेख यांनी बेस्ट महाव्यवस्थापक यांना यासंदर्भात नुकतेच निवेदन दिले आहे. एका स्मार्ट मीटरची किंमत १२ हजार रुपये आहे. हा बोजा कुणावर ते स्पष्ट नाही. केंद्र सरकार प्रति मीटर केवळ ९०० रुपये अनुदान देणार आहे. उर्वरित प्रतिमीटर ११ हजार १०० रुपयांचा बोजा ग्राहकास सोसावा लागणार आहे. स्मार्ट मीटरचा अनुभव हरियाणा व राजस्थानात चांगला नाही. या मीटरमुळे वीज बील दुप्पट येते. तसेच, स्मार्ट मीटर बंद पडतात. मीटर प्रीपेड असल्याने रिचार्ज संपले की वीज खंडित होते. कायद्यानुसार मीटर निवडीचे अधिकार वीज ग्राहकांना आहेत. मात्र, तरीही बेस्टकडून ग्राहकांवर स्मार्ट मीटर लादण्यात येत आहे.

आणखी वाचा-मुंबई : वर्तकनगर पोलीस वसाहतीचा पुनर्विकास मार्गी लागणार, लवकरच आर्थिक निविदा खुल्या होणार

अदानी कंपनीच्या लाभासाठी स्मार्ट मीटर योजना आणण्यात आली असून या योजनेचा घरगुती वीज ग्राहकांना काडीचाही लाभ नाही. शिवाय, स्मार्ट मीटरबाबत बेस्ट अधिकारी माहिती देत नाहीत, असे आरोप आमदार शेख यांनी निवेदनात केला आहे. महापालिकेचे बेस्ट व्यवस्थापन स्मार्ट मीटर योजनेवर १३०० कोटी रुपये खर्च करत आहे. स्मार्ट मीटरप्रकरणी बेस्ट व्यवस्थापनाने मुंबईकरांचे समाधान करावे. त्यासंदर्भात वर्तमानपत्रातून जाहिराती द्याव्यात, ग्राहकांचे जाहीर मेळावे घ्यावेत, लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी, असे आवाहन आमदार शेख यांनी बेस्ट प्रशासनाला केले आहे.

ग्राहकांचे समाधान होईपर्यंत या योजनेस स्थगिती द्यावी अन्यथा स्मार्ट मीटर योजना उधळून लावली जाईल, असा इशारा आमदार रईस शेख यांनी दिला आहे. पुढील आठवड्यात आमदार शेख बेस्ट महाव्यवस्थापकांची भेट घेणार असून समाजवादी पक्षाकडे स्मार्ट मीटर योजनेसंदर्भात मुंबईकरांनी पाठवलेले तक्रारींचे अर्ज जमा करणार आहेत.