मंगल हनवते

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतीतील संकेत क्रमांक ४१२ मधील विजेत्यांसाठी मंडळाने एक आनंदाची बातमी दिली आहे. मंडळाने या संकेत क्रमांकातील पंतप्रधान आवास योजनेतील ( अत्यल्प गट) घरांच्या ताबा प्रक्रियेस अखेर सुरुवात केली आहे. घराची १०० टक्के रक्कम भरलेल्या विजेत्यांना गाळा वितरण पत्र वितरित करण्यास मंडळाने सुरुवात केली आहे. त्यामुळे आता अनेक विजेते दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर हक्काच्या घरात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Union Minister Muralidhar Mohol friend visit in Kolhapur pune news
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना तालमीतील मित्र त्यांच्याच बंदोबस्तासाठी भेटतो तेव्हा…
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
bmc Nurses to go ahead with indefinite stir
मुंबई महापालिकेच्या सहाय्यक परिचारिका प्रसविका आंदोलनाच्या पवित्र्यात, २५ ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन
compromise between the producers and the censor board regarding the release of the emergency film mumbai news
‘इमर्जन्सी’ चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार; निर्माते- सेन्सॉर मंडळातील तडजोडीनंतर प्रकरण उच्च न्यायालयाकडून निकाली
PM Narendra Modi Thane, grand pavilion Ghodbunder,
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी, घोडबंदर भागातील मैदानात भव्य मंडपाची उभारणी
Navi Mumbai, Naina area, PM Narendra Modi,
नवी मुंबई : नैना क्षेत्रातील २५०० कोटी रुपयांच्या कामाचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन
shivajinagar to swargate metro
मेट्रो सुरु करा, पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आंदोलन
PM Narendra Modi, Heavy police presence pune,
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त, केंद्रीय सुरक्षा दलाची पथके दाखल

नव्या संगकीय प्रणालीनुसार पहिल्यांदाच सोडतीनंतरचीही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जात आहे. तर सोडतीपूर्वीच विजेत्यांची पात्रता निश्चित करण्यात आल्याने तात्पुरते देकार पत्र मिळाल्यानंतर अवघ्या काही दिवसात घराचा ताबा मिळेल असे वाटत होते. मात्र ताबा प्रक्रियेस काहीसा विलंब झाला. पण आता मात्र मंडळाने पीएमएवायमधील घरांची ताबा प्रक्रिया सुरु केली आहे. ४१२ संकेत क्रमांकातील ज्या विजेत्यांनी घराची १०० टक्के रक्कम भरली आहे, त्या विजेत्यांना गाळा वितरण पत्र १३ ऑक्टोबरपासून वितरित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विजेत्यांना हा मोठा दिलासा ठरणार आहे. दरम्यान आता गाळा वितरण पत्र मिळाल्यानंतर विजेत्यांना मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि देखभाल शुल्क भरून घराचा ताबा घेता येणार आहे. विजेत्यांना काही प्रक्रियेसाठी आता पहिल्यांदाच म्हाडा कार्यालयात जावे लागणार आहे.