आत्महत्येपूर्वी ‘आनंदी’ होती; आदल्या रात्री मैत्रिणीसोबत पार्टी
आत्महत्या करण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी प्रत्युषाने आपल्या मैत्रिणीला घरी पार्टीसाठी बोलावले होते. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत चाललेल्या या छोटेखानी पार्टीमध्ये प्रत्युषा कुठेही तणावात असल्याचे वाटत नव्हते, असा जबाब या पार्टीत हजर राहिलेल्या तिच्या एका मैत्रिणीने पोलिसांना दिला आहे. यामुळे प्रत्युषाच्या आत्महत्येचे गूढ वाढले आहे. दरम्यान, पोलिसांनी प्रियकर राहुल राज सिंह याचाही जबाब शनिवारी नोंदवला. आमच्यात वाद होते; परंतु त्यामुळे प्रत्युषा आत्महत्या करेल असे वाटले नव्हते असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
‘बालिकावधू’ मालिकेतून जनतेच्या पसंतीस उतरून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली प्रत्युषा बॅनर्जी शुक्रवारी सायंकाळी तिच्या गोरेगाव येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली होती. पोलिसांनी सुरू केलेल्या चौकशीत घटना घडली तेव्हा प्रत्युषाचा प्रियकर राहुल राज सिंह काही कारणांमुळे घराबाहेर गेल्याचे उघड झाले आहे. नेहमी घराची चावी सोबत ठेवणारा राहुल बाहेर जाताना चावी विसरला होता. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास परतल्यानंतर त्याने दार ठोठावले. प्रत्युषा काहीच प्रतिसाद देत नसल्याचे पाहून राहुलने वॉचमनला सांगून चावीवाल्याला बोलावले. यादरम्यान, शेजारच्या खोलीतील नोकराने मी घराच्या बाल्कनीतून जाऊन पाहतो, असे सांगितले. नोकर जेव्हा घरात गेला तेव्हा त्याला हॉलमध्ये प्रत्युषाने पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसले. शनिवारी सायंकाळी ओशिवरा स्मशानभूमीत प्रत्युषावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात प्रत्युषाचा मृत्यू गळफासामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा