जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीतज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचे सोमवारी दुपारी ४ वाजता निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तबलावादक पुत्र शंतनू पणशीकर आणि सतारवादक पुत्र  भूपाल पणशीकर असा परिवार आहे.

गेल्या आठवडय़ात मेंदूत रक्तस्राव झाल्याने पंडित दिनकर पणशीकर यांना अंबरनाथ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

Who was CPI(M) General Secretary Sitaram Yechury in marathi
अग्रलेख : उजवा डावा!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Shinde faction leader Shambhuraj Desai and Thackeray faction leader Ambadas Danve took darshan of Shrimant Dagdusheth Halwai Ganapati
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी घेतले दर्शन
Success Story of DSP Santosh Kumar Patel:
स्वप्नांपुढे सारे फिके! एकेकाळी उचलायचे विटा अन् आता झाले डीएसपी, वाचा संतोष कुमार पटेल यांची यशोगाथा
Film critic Aruna Vasudev passed away
चित्रपट समीक्षक अरुणा वासुदेव यांचे निधन
What Indrjit Sawant Said About Devendra Fadnavis?
Indrajit Sawant : “छत्रपती शिवरायांनी दोनदा सूरत लुटलं, राजकारणासाठी इतिहास…”, इंद्रजित सावंत यांची फडणवीसांवर टीका
“शरद पवार, उद्धव ठाकरेंना त्‍यांचे राजकारण लखलाभ…”, बदलापूरच्या घटनेवरून चंद्रशेखर बावनकुळेंकडून….
Professor Santosh Rane Opinion On Marathi Language
“सामाजिक परिवर्तनात साहित्यिकांची भूमिका महत्वाची”, प्राध्यापक संतोष राणेंचं वक्तव्य

नटवर्य प्रभाकर पणशीकर आणि ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे ते धाकटे बंधू होत. पंडित पणशीकर यांनी पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडून जयपूर घराण्याची गायकी आत्मसात केली. पं. सुरेशराव हळदणकर, पं. वसंतराव कुलकर्णी हेसुद्धा त्यांचे गुरू होत. ‘आडा चौताला’सारख्या कमी प्रचलित तालात त्यांनी रचलेल्या २०० बंदिशी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी बहुमूल्य ठेवा मानला जातो.

पंडित दिनकर हे ‘गोवा कला अकादमी’चे संगीत विभागप्रमुख होते. या माध्यमातून शेकडो शिष्य त्यांनी घडवले. गोवा राज्य पुरस्कार, ‘कोलकाता संगीत रिसर्च अकादमी पुरस्कार’ यांसह षडाक्षरी गवई, गानवर्धन, चतुरंग संगीत सन्मान पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन २०१७मध्ये केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांना पाठय़वृत्ती प्रदान केली होती.