मुंबई: मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नऊ सदस्यांच्या अपात्रतेची मागणी करणारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची याचिका रविवारी मध्यरात्री मिळाली असून त्याबाबत वैधानिक बाबी तपासून निर्णय घेणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनी रविवारी शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नऊ सदस्यांनी पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांची पक्षाचे प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याचे पत्रही पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. तर दुसरीकडे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनीच पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहे. याबाबत भूमिका स्पष्ट करताना, नियमानुसार सर्व बाबी तपासून याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तारूढ की विरोधी पक्षात काम करीत आहे हे आधी तपासावे लागेल.  तसेच कोणत्या पक्षाकडे संख्याबळ किती आहे याची कायदेशीर खातरजमा केल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेणार आहे. त्याचप्रमाणे दोन्ही गटांकडून आलेल्या अर्जाचा अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

scam in hoardings revenue in palghar news update
शहरबात : बॅनरचे उत्पन्न गेले कुठे?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
समान नागरी कायद्याअंतर्गत 'या' व्यक्तींबरोबर करता येणार नाही लग्न; नेमक्या अटी काय? (फोटो सौजन्य @Freepik)
UCC Marriage Law : समान नागरी कायद्याअंतर्गत ‘या’ व्यक्तींबरोबर करता येणार नाही लग्न; नेमक्या अटी काय?
rules for RTE admissions Change, Committee Education Department
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
10th exam, 12th exam, Maharashtra state board ,
राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
Guardian Minister Shivendra Singh Raje Bhosle Mitra Mandal circle of friends latur
लातूरामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाची ‘अचानक’ स्थापना
Story img Loader