चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल उन्नत रेल्वेमार्ग प्रकल्पांची घोषणा
मुंबईच्या उपनगरीय लोकलने दर दिवशी जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या ८० लाख मुंबईकरांचे कान आणि डोळे रेल्वे अर्थसंकल्पाकडे लागले असताना प्रत्यक्षात मुंबईकरांना तातडीने दिलासा देणारी एकही घोषणा या अर्थसंकल्पात झाली नाही. मुंबईच्या उपनगरीय सेवेकडे वळल्यावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल उन्नत रेल्वेमार्ग या दोन प्रकल्पांची घोषणा केली. मात्र, हे दोन्ही जुने प्रकल्प रेल्वेने नव्याने आपल्या पोतडीतून बाहेर काढले असल्याने मुंबईकरांची निराशा झाली. पण एमयूटीपी-२मधील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७११ कोटी रुपयांची तरतूद झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तसेच एमयूटीपी-३ योजना कार्यान्वित होण्यासाठी रेल्वेने पाच कोटी रुपये देऊ केले आहेत. रेल्वेचे हे सर्व प्रकल्प प्रवाशांच्या फायद्याचे असले, तरी या सर्व दीर्घकालीन उपाययोजना असल्याचे रेल्वेतील अधिकारीही मान्य करत आहेत. प्रवाशांना तातडीने दिलासा देण्यासाठी एकही योजना आखण्यात आलेली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा