महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये पाऊस कोसळतो आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या विविध शहरांमध्ये पाऊस पडत होता. मात्र मुंबईत पावसाने दडी मारली होती. आज अखेर मुंबईत पाऊस सुरु झाला आहे. काही भागात पाणीही साठलं आहे. मुंबईत पहाटेपासून पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागांमध्ये पाऊस सुरु झाला आहे. हवामान खात्याने यलो अलर्टही जारी केला आहे. त्याचप्रमाणे विदर्भातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे

कल्याण, डोंबिवली, ठाण्यात जोरदार पाऊस

कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यातही पावसाच्या जोरदार सरी सुरु झाल्या आहेत. सकाळपासून पावसाच्या धारा कोसळत आहेत. पुढच्या चार ते सहा तासांत या भागांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर कोसळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, विविध भागात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

Improvement in air quality in Mumbai
मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Maharashtra temperature rise news in marathi
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, पुढील २४ तासात असे असेल तापमान
sambar marathi news
सातारा: पाचगणीत आढळले दुर्मीळ पांढरे सांबर
Fish drought like conditions Dapoli coast strong wind speed fish trade
दापोली किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळ सदृश्य परिस्थिती, जोरदार वाऱ्याच्या वेगामुळे मच्छीची करोडो रुपयांची उलाढाल थांबली
maharashtra recorded 33 to 35 degrees celsius maximumtemperature
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा; जाणून घ्या, कमाल तापमान का वाढले
Traffic jam at Jamtha T-point even before start of cricket match
क्रिकेट सामना सुरु होण्यापूर्वीच जामठा टी-पॉइंटवर वाहन कोंडी
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…

हे पण वाचा- विश्लेषण : मुंबई, पुण्यात फळभाज्या का कडाडल्या?

एक्सवर #MumbaiRain

X या सोशल मीडिया हँडलवर मुंबईकरांनी #MumbaiRain हा हॅशटॅग दिला आहे तसंच त्यात पावसाचे विविध फोटो, व्हिडीओ मुंबईकर पोस्ट करत आहेत. घाटकोपर, कुर्ला या भागांमध्ये चांगला पाऊस पडतो आहे. स्टेशवरच्या पावसाचे, तसंच विविध भागांमधले फोटोही मुंबईकर पोस्ट करत आहेत. त्याचप्रमाणे दक्षिण मुंबईतले फोटोही या हॅशटॅगसह अनेकांनी पोस्ट केले आहेत. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. उपनगरातील बोरिवली, मालाड, कांदिवली, गोरेगाव परिसरात पावसाचा अधिक जोर दिसून येत आहे.

शेतकरी बांधवांना महत्त्वाचं आवाहन

राज्यात सध्या काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला आहे. ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी योग्य पाऊस झालेला नसतानाही पेरणीचा निर्णय घेतला होता, त्यांचा जीव आता टांगणीला लागला आहे. दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेती कामांना वेग आला आहे. शेतकरी खरीपाच्या पेरणीच्या तयारीत आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात देखील केली आहे. दरम्यान, अनेक भागात चांगला पाऊस झाला नाही, त्या भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. १०० मिमी पााऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असं आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.

Story img Loader