मुंबई : चित्रपट निर्मिती ही आवड असल्यामुळे आपला चित्रपटांकडे किंवा मनोरंजनाकडे अधिक कल आहे, असे सांगून लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांवर तीन भागांमध्ये चित्रपट करणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केली.  प्लॅनेट मराठी प्रस्तुत ‘अथांग’ वेब मालिकेची पहिली झलक राज यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

 ‘‘गांधी चित्रपटानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर मोठा चित्रपट यावा, अशी आपली इच्छा आहे. त्यामुळेच लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांवर मी तीन भागांमध्ये चित्रपट करणार असल्याची घोषणा राज यांनी केली.  महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता अक्षय कुमार साकारणार असल्याने आता राज ठाकरे यांचा मराठी बाणा कुठे गेला, असा प्रश्न विचारणाऱ्यांना राज ठाकरेंनी काहीही झालं तरी मी कट्टर मराठी आहे, असे उत्तर दिले. आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो तिथे कसलाच थांगपत्ता लागत नाही आणि आज मी थेट अथांग वेब मालिकेच्या झलक प्रसिद्धीच्या सोहळय़ासाठी आलो आहे, असे राज यांनी मिश्किलपणे म्हटले.

Special trains for Anganewadi Yatra news in marathi
आंगणेवाडी यात्रेसाठी विशेष रेल्वेगाड्या
Shiv Sena mouthpiece claims tension between Fadnavis and Shinde
एसटी महामंडळातील नियुक्तीवरून मुख्यमंत्र्यांची शिंदे गटावर कुरघोडी
ubt shiv sena chief uddhav thackeray criticized rebels
आरक्षण दिले तरी लोक डबे बदलतात! पक्षातून बंडखोरी करणाऱ्यांवर उद्धव ठाकरे यांची टीका
bmc impose waste management charges in Mumbai
मुंबईत कचऱ्यावर साडेसात हजारांपर्यंत शुल्क; खर्च वाढल्याने पालिकेकडून प्रस्ताव
Maharashtra government plan new city development close Vadavan port
‘वाढवण’लगत आणखी एक मुंबई; १०७ गावांतील ५१२ चौ. किमी विकास केंद्राचा प्रस्ताव
Customs officials seized 5 Siamang gibbons from passenger arriving at Mumbai airport
मुंबई विमानतळावर ५ सियामंग गिबन्स जप्त
construction of footpath is understood to have stopped by contractor due to opposition from nearby shopkeepers
पदपथाच्या बांधकामात दुकानदारांचा अडसर, पर्जन्य जलवाहिनी वळविण्याचा अट्टाहास
maharashtra recorded 33 to 35 degrees celsius maximumtemperature
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा; जाणून घ्या, कमाल तापमान का वाढले
farmers get rs 592 crore 34 lakh 90 thousand 530 in bank accounts farmers affected by natural calamities
अखेर नैसर्गिक आपत्ती बाधितांना मिळाली मदत; जाणून घ्या, कोणत्या विभागाला, जिल्ह्याला मिळाली सर्वाधिक मदत
Story img Loader