मुंबई : राम आणि सीता देशातील सर्व नागरिकांचे दैवत आहेत. ते केवळ हिंदूंचा वारसा नसून, देशातील प्रत्येक व्यक्तीची संपत्ती असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी गुरुवारी केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवाजी पार्क येथे आयोजित दीपोत्सवाच्या उद्घाटन प्रंसगी अख्तर बोलत होते.

हेही वाचा >>> भाजपने सरकारचा पाठिंबा काढावा ! आदित्य ठाकरे यांचा सल्ला

Success Story Of IRS officer Vishnu Auti
Success Story : एका जिद्दीची गोष्ट! शाळेतील शिक्षक ते आयआरएस अधिकारी; वाचा विष्णू औटी यांची प्रेरणादायी कहाणी
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
tanishk vice president arun narayan
‘नैसर्गिकच्या तुलनेत कृत्रिम हिऱ्यांना अनेकांगी मर्यादा’; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायण यांचे प्रतिपादन
Congress President Mallikarjun Kharge became unwell
Mallikarjun Kharge : भाषण करताना बिघडली मल्लिकार्जुन खरगेंची प्रकृती, पक्षाचे कार्यकर्ते हात धरुन घेऊन गेले
Sarsanghchalak Mohan Bhagwat appeal to the bjp new generation regarding Pt DeenDayal Upadhyay
भाजपच्या आजच्या पिढीने दीनदयाळजींचे गुण अंगीकारावेत; सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
Jagan Mohan reddy
Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती
Prabhatai, Hariprasad Chaurasia, Prabhatai Atre,
संगीत हेच प्रभाताईंचे पहिले प्रेम, पं. हरिप्रसाद चौरासिया यांची भावना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह जेष्ठ पटकथाकार सलीम खान, अभिनेता रितेश देशमुख, आशुतोष गोवारीकर, शर्मिला ठाकरे, मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह मनसे पदाधिकारी  यावेळी उपस्थित होते.  ‘‘कार्यक्रमाला आपल्याला आमंत्रित केल्याबद्दल काही लोकांना आश्चर्य वाटले असेल. राज ठाकरेंना सलीम-जावेदशिवाय दुसरे कोणी मिळाले नाही का, असा प्रश्नही अनेकांना पडला असेल. स्वत:ला नास्तिक समजणारे जावेद अख्तर या मंचावर कसे असेही अनेकांना वाटले असेल. पण, राज ठाकरे हे आमचे परममित्र असून, त्यांनी शत्रूला आमंत्रण दिले तरी तो नकार देणार नाही.  आम्ही तर मित्र आहोत’’, असे अख्तर यांनी यावेळी नमूद केले. ‘‘लहानपणी श्रीमंत लोक ‘गुड मॉर्निग’ म्हणताना पाहत होतो. पण रस्त्यावरून जाणारा सामान्य माणूस ‘जय सियाराम’ म्हणायचा. त्यामुळे सीता आणि राम यांचा वेगळा विचार करणं हे पाप आहे. सियाराम हा शब्द प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहे. सिया आणि राम यांना फक्त एकानेच वेगळं केले होते. त्याचे नाव रावण. त्यामुळे त्यांना जो वेगळे करेल तो रावण असेल. म्हणून तुम्ही ‘जय सियाराम’च म्हणा’’, असे आवाहन त्यांनी केले.