मुंबई : राज्यात सरकारी सेवेतील ७५ हजार जागांच्या भरतीसाठी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार ३१ डिसेंबपर्यंत सरकारी नोकरभरतीच्या सर्व जाहिरातींना ही वाढीव वयोमर्यादा लागू होईल.

 स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून राज्य सरकारने विविध विभागांत ७५ हजार पदे भरण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार विविध विभागांत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात सरकारी नोकरीसाठी खुल्या प्रवर्गासाठी ३३, तर मागास प्रवर्गासाठी ३८ वर्षे अशी कमाल वयोमर्यादा आहे. मात्र, मध्यंतरी करोनामुळे दोन वर्षे राज्यात भरती प्रक्रिया बंद होती.

applications for crop insurance
एक रुपयात पीकविम्याचा अर्ज भरण्यासाठी १०० ते २५० रुपयांची मागणी; ई-सेवा केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांची लूट?
gross liabilities of government increased to rs 171 78 lakh crore at the end of march 2024
सरकारचे दायित्व १७१ लाख कोटींवर; मार्चअखेरीस संपलेल्या तिमाहीत ३.४ टक्क्यांची वाढ
Maharashtra state leading in foreign investment Mumbai
विदेशी गुंतवणुकीत राज्य आघाडीवर; ‘मैत्री’ कक्षाकडे उद्याोजकांच्या तक्रारींचा ओघ वाढला
Onion procurement rate across the state is uniform 2940 per quintal
राज्यभरात कांदा खरेदी दर एक समान, २९४० प्रती क्विंटल दर ; कमी दरामुळे सरकारी खरेदी अडचणीत
employee get the arrears of the 5th quarter of the 7th Pay Commission along with the salary for the month of June
राज्य सरकारी कर्मचाऱ्यासाठी खूशखबर! सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पाचवा हप्ता…
Patna High Court decision to cancel increased reservation in Bihar
बिहारमधील वाढीव आरक्षण रद्द; पाटणा उच्च न्यायालयाचा नितीश सरकारला धक्का
Expert Committee Submits Recommendations report to Solve Urban Cooperative Banks, Expert Committee Submits Recommendation report Urban Cooperative Banks to state government, Urban Cooperative Banks Issues
नागरी सहकारी बँकांच्या संचालक मंडळ सदस्यांना नफ्यात दहा टक्के वाटणी, तज्ज्ञ समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर
Water, electricity, dangerous buildings,
ठाण्यात अतिधोकादायक इमारतींचा पाणी, वीज पुरवठा खंडीत; आयुक्तांच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाची कारवाई सुरू

त्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा पार केली असून, त्यांनी नोकरीची संधी गमावू नये, यासाठी कमाल वयोमर्यादेत वाढ करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्याची दखल घेत राज्य सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी  प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी विहित केलेली कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा २ वर्षांनी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाचा कायर्म्भार सांभाळणारे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी विधिमंडळात एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली. याबाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल, असे पाटील यांनी सांगितले.

लाखो उमेदवारांना दिलासा

महाभरती अंतर्गत शासन सेवेत नियुक्तीसाठी वयोमर्यादा वाढविण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती. ही मागणी मान्य झाल्याने लाखो बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.