मुंबई: गोवंडी परिसरात अनेक अनधिकृत सिमेंट मिक्सर प्रकल्प असून त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे सर्व प्रकल्प महानगरपालिकेच्या एम पूर्व कार्यालयापासून जवळ आहेत. महानगरपालिकेने तत्काळ कारवाई करून हे सिमेंट मिक्सर प्रकल्प बंद करावेत, अशी मागणी मनसेने केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून गोवंडी परिसरातील देवनार कचराभूमी आणि एसएमएस कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे गोवंडी आणि आसपासच्या परिसरातील अनेक रहिवासी श्वसनाच्या आजाराने त्रस्त आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये या परिसरात अनधिकृत सिमेंट मिक्सर प्रकल्प उभे राहिले आहेत. या सिमेंट मिक्सर प्रकल्पांमधून परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. सिमेंट मिक्सर प्रकल्पात येणाऱ्या-जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे येथील रस्त्यांचीही वाताहात होत आहे. त्यामुळे एकूणच या परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

cost of Ten thousand crore pollution free project in Watad Panchkroshi says Uday Samant
प्रदूषण विरहीत वाटद पंचक्रोशीत दहा हजार कोटींचा प्रकल्प; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
dharavi re devlopment ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
धारावीत लवकरच पाच नमुना सदनिका; पात्र रहिवाशांसह अपात्र, पात्र लाभार्थींना घरांविषयी माहिती
Information of Samarjit Ghatge that Shahu factory will set up bio CNG solar power plant Kolhapur news
शाहू कारखाना बायो सीएनजी,सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार; समरजित घाटगे यांची माहिती
Mumbai Metropolitan Region Development Authority
ठाण्यातील महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचा मार्ग मोकळा
is it Municipalities responsible for water supply to large housing projects
मोठ्या गृहप्रकल्पांना पाणीपुरवठ्याची जबाबदारी महापालिकांची?
MMRDA considers three options for soil disposal
ठाणे : एमएमआरडीएकडून माती विल्हेवाटीसाठी तीन पर्यायांचा विचार
Goregaon Mulund Expressway project,
गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाचा खर्च अडीचशे कोटींनी वाढला

हेही वाचा… गालगुंडाची नवी साथ; बहिरेपणाचा धोका; विषाणूमध्ये परिवर्तन झाल्याची तज्ज्ञांना शंका

आश्चर्याची बाब म्हणजे हे सर्व प्रकल्प महानगरपालिकेच्या एम पूर्व कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहेत. या प्रकल्पांमधून अखंड प्रदूषण होत असते. मात्र महापालिकेकडून याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने तत्काळ आशा प्रकल्पांवर कारवाई करून ते बंद करावेत अशी मागणी मनसेने केली आहे. याबाबत मनसेचे महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष सतीश वैद्य यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगरपालिकेला पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वैद्य यांनी दिला आहे.