मुंबई : लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजप यांचा ‘४०० पार’चा नारा प्रत्यक्षात येऊ नये, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही इच्छा होती. भाजपला अपेक्षित असलेले यश मिळू नये म्हणून संघाकडूनही प्रयत्न झाले. निवडणुकीच्या काळात संघात निरुत्साह होता, असा दावा ‘स्वराज्य भारत’चे संस्थापक व राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केला. गुरुवारी झालेल्या ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकसभा निवडणूक निकाल, भाजपची पीछेहाट, भाजप-रा.स्व. संघातील संबंध, इंडिया आघाडीचे भवितव्य, राहुल गांधी यांचे नेतृत्व अशा विविध मुद्द्यांवर योगेंद्र यादव यांनी परखड मते मांडली. निवडणूक प्रचारकाळात रा. स्व. संघाची आता गरज उरलेली नाही, हे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे वक्तव्य हे त्या पक्षाच्या ध्येयधोरणाचा भाग होता. नड्डा यांनी हे विधान स्वत:हून केल्याची सुतराम शक्यता नाही. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही मोदी यांनी रा. स्व. संघाला दूरच ठेवले होते. रा. स्व. संघात मोदी यांच्याबद्दल फारशी आपुलकी नव्हती. निवडणूक निकालानंतर रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अहंकाराबद्दल केलेले विधानही बोलके आहे, याकडे यादव यांनी लक्ष वेधले. २०१० नंतर भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानेच २०१४च्या निवडणुकीत रा. स्व. संघाने ताकदीने भाजपला मदत केली होती. पण तसा उत्साह २०२४ मध्ये दिसला नाही. मोदी यांच्या काळातील उद्योग जगताशी निर्माण झालेली जवळीकही संघाला पसंत पडलेले नाही, असे मत यादव यांनी व्यक्त केले.

countrys first Birdpark was built in Nagpur
आंबा-पेरू-चिंचेची झाडे, त्यावर फक्त पक्षांचा संचार आणि बरंच काही… नागपुरात साकारला देशातील पहिला ‘बर्ड पार्क’
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Narendra Patil demanded control over rising hooliganism from fake organizations in Mathadi Mandal
नवी मुंबई :माथाडी मंडळातील बनावट संघटनांच्या गुंडगिरीला चाप लावा,माथाडी संघटनेचे नरेंद्र पाटील यांचा गृहमंत्र्यांना घरचा आहेर
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
नव्यांचे लाड करताना जुन्या कार्यकर्त्यांनाही संधी द्या! भाजप नेत्यांची नेतृत्वाकडे मागणी
chandrashekhar bawankule back nitesh rane over controversial remarks on muslim
बावनकुळेंकडूनही नितेश राणेंची पाठराखण, म्हणाले ” त्यांचे वक्तव्य…”
Protest in front of residence of Balwant Wankhade on behalf of Vanchit Bahujan Aghadi to protest against Rahul Gandhi speech
अमरावती : ‘वंचित’ आणि काँग्रेस कार्यकर्त्‍यांमध्‍ये राडा; खा.वानखडेंच्या घरासमोर… 
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’

हेही वाचा >>> १५ मच्छीमार संघटनांचा ‘वाढवण’ला पाठिंबा; बंदर समन्वय समिती बैठकीत सकारात्मक चर्चा

२६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक झाला असला तरी भाजपला २०२४च्या निवडणुकीनंतर दुसरे प्रजासत्ताक तयार करायचे होते. २०१९ अखेरीस पहिले प्रजासत्ताक संपुष्टात आले होते. दुसरे प्रजासत्ताक प्रत्यक्षात आणण्याकरिताच ‘चारशे पार’चा नारा भाजपकडून देण्यात आला होता. सर्व यंत्रणांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे होते. पण भाजपचा हा डाव यशस्वी होऊ शकला नाही, असे निरीक्षण यादव यांनी नोंदविले.

लोकसभेची २०२४ची निवडणूक ही निवडणूक नव्हे तर सार्वमत होते. ‘मोदी गॅरंटी’ची भाजपने मोठ्या प्रमाणावर दवंडी पिटली होती. सार्वमताची सारी तयारी आधीपासून करण्यात आली होती. जनता आमच्याबरोबर आहे, अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. पण देशातील मतदारांनी ‘मोदी गॅरंटी’च्या विरोधात कौल दिला. ‘हो’ की ‘नाही’ यावर झालेल्या सार्वमतात मतदारांनी ‘नाही’ला कौल दिला. यामुळेच भाजपचे संख्याबळ २४० वरच सीमित राहिले. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीवर आपला अंकुश राहील, या दृष्टीने भाजपने प्रयत्न केला. दुर्दैवाने निवडणूक आयोगापासून साऱ्याच यंत्रणांचा कारभार भाजपच्या इशाऱ्यावरून सुरू होता. मोदी निवडून येणारच अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. बहुतांशी प्रसारमाध्यमांमधून भाजपने आपली प्रतिमा उजळून घेतली होती. त्याचाही निवडणूक निकालावर परिणाम झाला. अन्यथा भाजपला २४०चा आकडाही गाठणे शक्य झाले नसते, असे मतही यादव यांनी व्यक्त केले.