पावसाळानंतर विविध कामानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (मुंबई विमानतळ) दोन्ही धावपट्ट्या येत्या १८ ऑक्टोबरला सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. परिणामी, या काळात विविध कंपन्यांच्या विमान सेवा रद्द कराव्या लागणार असून या विमान सेवेसाठी आधीच आरक्षण केलेल्या प्रवाशांना मनस्ताप होणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई : चर्चगेट रेल्वे स्थानकात रंगला विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार

Mumbai Metro 3 Introduces Free Bus Service
मेट्रो ते विमानतळ मोफत बससेवा; प्रवाशांच्या सोयीसाठी टी२ टर्मिनल मेट्रो स्थानकविमानतळ एमएमआरसीची सेवा
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Mumbai bomb threat in three flights
तीन विमानांमध्ये बॉम्ब असल्याचे दूरध्वनी; दोन विमाने मुंबईत थांबवली, एक दिल्लीला वळवले
What is Belly Landing pixabay
Belly Landing : विमानाचं बेली लॅन्डिंग कसं केलं जातं? आपत्कालीन स्थितीत प्रवाशांना वाचवण्यासाठी शेवटचा पर्याय
Air India buys 85 Airbus
तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या हवेतच दोन तास घिरट्या; १४० प्रवासी करत होते प्रवास; अखेर झालं सुरक्षित लँडिंग!
Navi Mumbai Airport First Flight
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान! धावपट्टीची चाचणी यशस्वी; नियमित वाहतूक कधी सुरू होणार?
Air Force fighter jet test at Navi Mumbai Airport soon
नवी मुंबई विमानतळावर वायू दलाच्या लढाऊ विमानाची चाचणी लवकरच
IndiGo airlines has announced the launch of direct flights between Pune and Bhopal Pune news
दिवाळीआधी हवाई प्रवाशांना खुशखबर! पुणे- भोपाळ दररोज थेट विमानसेवा तर इंदोर, चेन्नई अन् रायपूरसाठीही उड्डाण 

मुंबई विमानतळावर १४/३२ आणि ०९/२७ अशी मुख्य, तसेच पर्यायी धावपट्टी आहे. ही धावपट्टी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या सहा तासांत देखभाल, दुरुस्तीचे कामे करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ नंतर पुन्हा धावपट्टी विमान उड्डाणासाठी खुली करण्यात येणार आहे. धावपट्टीच्या दुतर्फा असलेले दिवे, एरोनॉटिकल ग्राउंड दिव्यांमध्ये बदल बदल करण्यात येणार आहे. प्रवाशांनी या काळातील विमान उड्डाणांबाबत संबंधित विमान कंपन्यांकडून माहिती घ्यावी, असे आवाहन मुंबई विमानतळ प्रशासनाने केले आहे.याआधी दोन्ही धावपट्ट्या पावसाळापूर्व कामांसाठी १० मे रोजी सहा तास बंद ठेवण्यात आल्या होत्या. सध्या विमानतळावर दररोज ८०० हून अधिक विमान उतरतात आणि उड्डाणे होतात. मुंबई विमानतळावर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानांची वर्दळ वाढली असून प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे.