मुंबई : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून ज्या योजना सुरू केल्या, त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात बंद केल्या जात आहेत, पण अदानींच्या योजना सुरू आहेत. केवळ गरीबांच्या योजना का बंद केल्या जात आहेत? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या सरकारच्या काळातील योजना बंद करण्यात येत आहेत, यावर शिंदेंनी आवाज उठवायला हवा, असा सल्ला शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी दिला.

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर लाडका भाऊ, आनंदाचा शिधा या योजना बंद केल्या जात आहेत. यावर एकनाथ शिंदेंनी आवाज उठवला पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या काळात जेव्हा ‘शिवभोजन थाळी’ सुरू केली तेव्हा एकनाथ शिंदे मंत्री होते. त्या योजनेचे शिंदेंनी उद्घाटन केले आहे. गरीबांच्या योजना का बंद होतात, हा प्रश्न सरकारमधील लोकांनी मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

Eknath Shinde on Sanjay Raut
“वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंगं…”, संजय राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
SIT probes conspiracy against Devendra Fadnavis Eknath Shinde Mumbai news
फडणवीस, शिंदेंविरोधातील कारस्थानाची ‘एसआयटी’ चौकशी; खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकरण
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
Hasan Mushrif statement on Kolhapur boundary extension in marathi
कोल्हापूर हद्दवाढीत लोकप्रतिनिधीच आडवे; हसन मुश्रीफ यांचे टीकास्र
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

गरिबांचे बेरोजगारीला कंटाळून पलायन तानाजी सावंत यांचा मुलगा पळून गेला की त्याचे अपहरण झाले हे त्यांनीच सांगितले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये खंडणी, अपहरण आणि पलायन अशी प्रकरणे रोज घडत आहेत, यात काही नवे नाही. पण श्रीमंतांची मुले स्वत:च्या विमानाने बँकॉकला पळून जातात आणि गारिबांची मुले बेरोजगारीला कंटाळून रेल्वे फलाटावरून कुठेतरी निघून जात आहेत, अशी टीका राऊत यांनी तानाजी सावंत यांच्या पुत्राबाबत बोलताना केली.

अण्ण हजारेंची भूमिका संशयास्पद

नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये देशात आणि महाराष्ट्रात अनेक घोटाळे झाले, पण अण्णा हजारे यांनी साधी कूसही बदलली नाही. ते भ्रष्ट सरकारच्या बाजूने उभे राहिले. आताही त्यांची भूमिका संशयास्पद आहे. ते गांधीवादी आहेत, त्यांच्यासारखी सत्याची कास अण्णा हजारेंनी धरली तर आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

Story img Loader