राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी “आमदारांनी केलेला उठाव यशस्वी झाला नसता, तर एकनाथ शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती”, असा खळबळजनक दावा केला. यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यावर आता शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच दीपक केसरकरांना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली.ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “बापरे. खरं म्हणजे त्याबद्दल पोलिसांनी दीपक केसरकरांना ताबडतोब ताब्यात घेतलं पाहिजे. कारण एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार घोळतो आहे आणि ते केसरकरांना माहिती आहे.”

Exploding notes in Anand Ashram Dighe confidant Nandkumar Gorule was enraged
आनंद आश्रमात नोटांची उधळण, दिघे साहेबांचे विश्वासू नंदू गोरूले संतापले, म्हणाले…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Former MP Rajan Vikhare criticizes Chief Minister Eknath Shinde
लाज असेल तर माफी मागा, माजी खासदार राजन विचारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
Yograj Singh Shares Incident of His Father Said My Father Killed a Tiger Smeared its blood on my lips and Forehead
Yograj Singh: “माझ्या वडिलांनी वाघाची शिकार करून रक्त माझ्या ओठाला लावलं…”, युवीच्या बाबांनी सांगितला धक्कादायक किस्सा
NCP ajit pawar group,Dharmarao Baba Atram eldest daughter join sharad pawar group
राष्ट्रवादीच्या जेष्ठ मंत्र्याच्या घरातच फूट, मुलगी लवकरच शरद पवार गटात…सोबत जावयानेही….
Vanraj Andekar Shot Dead in Pune News| Pune Crime News Vanraj Andeka Attack
Vanraj Andekar Shot Dead : वनराज आंदेकरांवर बहिणीच्या पतीकडून गोळीबार; मालमत्तेच्या वादातून आंदेकरांचा खून
kangana Ranaut and simranjit singh mann
Kangana Ranaut : “कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव”, माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”

“…तेव्हा एकनाथ शिंदे आत्महत्या करू शकतात”

“उद्या विधानसभा अध्यक्षांनी घटनेला स्मरून काही निकाल दिला तर एकनाथ शिंदे आत्महत्या करू शकतात. त्यामुळे पोलिसांनी दीपक केसरकरांना ताबडतोब ताब्यात घेऊन कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी संजय राऊतांनी केली.

दीपक केसरकर काय म्हणाले होते?

दीपक केसरकर म्हणाले, “अस्मितेसाठी एकनाथ शिंदेंनी बंड केलं. उद्धव ठाकरे वचन द्यायचे आणि तोडायचे. एकनाथ शिंदे यांनी निश्चितपणे उठाव केला. नंतर एकनाथ शिंदेंना वाटलं, ही सर्व लोक माझ्याबरोबर प्रेमाने आली आहे. कारण, शिंदेंचा अपमान झाला, तो दिवस वर्धापनदिनाचा होता.”

“शिंदेंना खालच्या दर्जाची वागणूक दिली”

“वर्धापनदिनादिवशीच एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला. शिंदेंना खालच्या दर्जाची वागणूक दिली. एकनाथ शिंदे हे विधिमंडळाचे नेते होते. त्यांचा अपमान का केला? याचं उत्तर दिलं पाहिजे. एकनाथ शिंदे रागवून गेले असते, तर परत येण्याची तयारीही दाखवली होती,” असेही दीपक केसरकरांनी सांगितलं.

“…तेव्हा एकनाथ शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती”

“एकनाथ शिंदे हे सच्चे शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदेंनी म्हटलं, ‘मला जेव्हा वाटलं उठाव यशस्वी होणार की नाही, तेव्हा एकच गोष्ट केली असती. माझ्याबरोबर आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवलं असतं. मी एक फोन केला असता, माझी चूक झाली आहे. यांची काही चूक नाही. तिथेच माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती,’” असं शिंदेंनी सांगितल्याचं दीपक केसरकर म्हणाले.

हेही वाचा : “महाराष्ट्रात गद्दारी व्हावी यासाठी मोदींनीही प्रयत्न केले, त्यामुळे आता…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

“प्रसंगी जीव गेला तरी चालेल”

“माझ्यामुळे एकाही आमदाराचं राजकीय नुकसान होता कामा नये, प्रसंगी जीव गेला तरी चालेल. असं म्हणणाऱ्या माणसाच्या मागे लोक उभी राहणार नाहीत, तर कोणाच्या राहणार,” असेही दीपक केसरकरांनी म्हटलं.