दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवल्यामुळे आज महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. आज मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राचा विजय!’ राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, “महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना…”

What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं विधान, “शरद पवारांची गुगली भल्याभल्यांना कळत नाही, त्यांनी मला…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
eknath shinde anand dighes film became super hit and our Vidhansabha picture also became super hit Now we want to make third film
खासदार फुटीच्या चर्चेवर एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी
Maharashtra Disaster Management Authority Mahayuti govt
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात एकनाथ शिंदेंऐवजी अजित पवारांची निवड; महायुतीत नाराजी कायम?
MLA Jitendra Awhad reaction after badlapur rape case accused akshay shindes parents withdraw the case
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, “…तर अक्षय शिंदेचे भूत तुमच्या मानगुटीवर बसणार, हे नक्की”
Kiran Samant On Rajan Salvi
Kiran Samant : “…म्हणून त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला नाही”, किरण सामंत यांचा राजन साळवींबाबत मोठा दावा
Shiv Sena mouthpiece claims tension between Fadnavis and Shinde
एसटी महामंडळातील नियुक्तीवरून मुख्यमंत्र्यांची शिंदे गटावर कुरघोडी
Eknath Shinde on Sanjay Raut
“वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंगं…”, संजय राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

काय म्हणाले संजय राऊत?

एकनाथ शिंदे यांना कोणीही मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत. पहिल्या १० मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचं नाव नाही, हे दुर्देवं आहे. महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे. मात्र, गेल्या सहा-सात महिन्यांपासून महाराष्ट्र हे या देशाच्या खिजगंटीत अजिबात नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यानंतर ते चौथ्या क्रमांकावर आले. त्यामुळे त्याचं सरकार पाडण्यात आलं. महाराष्ट्राचे पंख कापले गेले. राज्याच विकास काही लोकांना पाहवत नाही. दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवल्यामुळे आज महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा – “हिंमत असेल, तर एकत्र निवडणुका घ्या”, उद्धव ठाकरेंच्या विधानाचा देवेंद्र फडणवीसांनी घेतला समाचार; म्हणाले…

पुढे बोलताना त्यांनी राहुल गांधींना बजावण्यात आलेल्या हक्कभंग नोटीशीबाबतही प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांना नोटीस बजवण्याचं कोणतही कारण नव्हतं. त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलं आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं पंतप्रधानांनी द्यायला हवी होती. त्यांना ती संधी होती. मात्र, त्यांनी या प्रश्नांची उत्तरं न देता हक्कभंग केला आहे. हक्कभंगाची कारवाई तर पंतप्रधान मोदींवर व्हायला हवी होती. मात्र, ती राहुल गांधींवर झाली. यालाच हुकूमशाही म्हणतात, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस हे हवेतील…”; अमोल मिटकरींची खोचक टीका; नव्या राज्यपालांबाबतही केलं भाष्य; म्हणाले, “महाराष्ट्रात येण्यापूर्वी…”

भाजपा कार्यकारणीच्या बैठकीतबाबत बोलताना ते म्हणाले, भाजपाने कितीही ठराव पारीत केले, तरी मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच विजय होईल. ज्या मुख्यमंत्र्यांचा समावेश पहिल्या १० मुख्यमंत्र्यांमध्येही होत नाही, त्यांच्या नेतृत्वात जर भाजपा लढणार असेल, तर कोणत्याही महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचा विजय होणं शक्यच नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Story img Loader