औरंगजेबाप्रमाणे दिल्लीवरुन मोदी आणि शाह यांच्या स्वाऱ्या महाराष्ट्रावर होत आहेत. त्यांच्यापासून महाराष्ट्राचे रक्षण करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर त्यावर धनिकांची आणि व्यापाऱ्यांची वक्रदृष्टी राहिली आहे. काल उद्धव ठाकरे हजारो शिवसैनिकांसह हुतात्मा चौकात गेले आणि महाराष्ट्राच्या लढ्यात शहीद झालेल्या सर्वांना त्यांची अभिवादन केलं. पण ही लढाई आता पुन्हा सुरु झाली आहे. महाराष्ट्राचं अखंडत्व आणि वैभव टिकवण्यासाठी ही लढाई आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

ST STrike
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची व्याप्ती वाढली, मराठवाडा अन् खान्देशात सर्वाधिक फटका; शिवनेरीची स्थिती काय?
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
gunratna sadavarte sharad pawar news
“एसटी कर्मचाऱ्याच्या संपात शरद पवार, उद्धव ठाकरेंची माणसं”; गुणरत्न सदावर्तेंचा आरोप; म्हणाले, “ज्या कृती समितीने…”
BJP Leader Said This Thing About Ajit Pawar
Mahayuti : महायुतीत ठिणगी? “अजित पवारांबरोबरची युती म्हणजे असंगाशी संग, त्यांनाही..”, भाजपा नेत्याचं वक्तव्य
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
sharad pawar group
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्यावरून शरद पवार गटाचं भाजपावर टीकास्र; म्हणाले,“राम मंदिर अन् संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या…”
Anil Deshmukh, Shakti Act,
महाराष्ट्रात ‘शक्ती’ कायद्याला केंद्रामुळे विलंब? माजी गृहमंत्र्यांनी थेटच…
Jayant Patil On Devendra Fadnavis
Jayant Patil : जयंत पाटलांची फडणवीसांवर खोचक टीका; म्हणाले, “महाराष्ट्राकडे पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही”

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटण्याचं कारण;म्हणाले, “शरद पवार, उद्धव ठाकरे..”

पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीकाही केली. “औरंगजेबाप्रमाणे दिल्लीवरुन मोदी आणि शाह यांच्या स्वाऱ्या महाराष्ट्रावर होत आहेत. त्यांच्यापासून महाराष्ट्राचे रक्षण करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर आहे. काही भटकते आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी आणि महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या हक्काचे आणि अधिकाराचे लचके तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – अजित पवार शरद पवारांकडे परत आले तर काय? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “एखाद्याने…”…

“नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर बघून यावी, महाराष्ट्रावर चाल करणाऱ्यांची काय अवस्था होते, हे त्यावरून त्यांना लक्षात येईल”, असा इशाराही त्यांनी दिला.