डिझेलऐवजी विजेवर धावणारी रेल्वे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असल्याने भारतीय रेल्वेमध्ये विद्युतीकरण करण्यावर भर दिला जात आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून वर्षाला ५५६.५६ कोटी रुपयांची बचत करण्यात मध्य रेल्वेला यश आले आहे.

हेही वाचा- मार्च महिन्यात शेवटची लोकल सीएसएमटी – कर्जत बदलापूरपर्यंतच; कर्जतमधील प्रवाशांचे होणार हाल

Brihanmumbai Municipal Corporation 2025 budget
BMC Budget 2025: शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प ३९५५ कोटींचा, गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४५७ कोटी रुपयांनी वाढ
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
mumbai municipal corporation budget
BMC Budget 2025 : मुंबई महापालिकेचा ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर, आगामी अर्थसंकल्पात १४ टक्क्यांनी वाढ
Economic Survey Report predicts possible growth rate of 6 8 percent
६.८ टक्क्यांचा विकासवेग शक्य
Need for economic reforms Recommendation to create 8 million jobs annually
आर्थिक सुधारणांची गरज! सर्वंकष नियमन सुधारणा, वार्षिक ८० लाख रोजगार निर्मितीची शिफारस
Ananth Nageswaran
अग्रलेख: कसचे काय नि कसचे काय!
सोलापुरात ६२०.८० कोटींपैकी दहा महिन्यांत केवळ २३३.४५ कोटी खर्च; विकास आराखड्याला मर्यादा, निवडणूक आचारसंहितेचाही फटका
Loksatta Analysis in Mulund Control inflation through budget mumbai new
अर्थसंकल्पातून महागाईवर नियंत्रण कितपत?उद्या सायंकाळी मुलुंडमध्ये ‘लोकसत्ता विश्लेषणा’तून वेध

भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे बनण्यासाठी कार्यरत असून २०३० पूर्वी ‘निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तसेच, विद्युतीकरणामुळे सर्वच रेल्वेची गती वाढणार असून वेळेची बचत होणार आहे. यासह मुंबई विभागाची इंधन खर्चावरील ५५६.५६ कोटी रुपयांची बचत होईल. तसेच वार्षिक १.६४ लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल. रेल्वेच्या विद्युतीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. तसेच, डिझेल इंजिन सेवेतून बाद करण्यास सोयीस्कर होईल.

हेही वाचा- मुंबईतील ‘या’ दोन मेट्रो स्थानकांवर आता असणार माहिलाराज, मेट्रो स्थानक चालविण्याची संपूर्ण जबाबदारी महिलांवर

देशातील पहिली विद्युत रेल्वे ही १९२५ साली हार्बर मार्गावरील तत्कालिन बॉम्बे व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्लादरम्यान धावली. त्यानंतर, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील डीसी ट्रॅक्शनचे एसी ट्रॅक्शनमध्ये रूपांतर करण्यास २००१ मध्ये सुरुवात झाली आणि २०१६ पर्यंत पूर्ण झाले. त्यामुळे उपनगरीय विभागात नऊ डबा लोकल सेवेचे रूपांतर १२ डबा लोकलमध्ये करण्यात आले. त्यामुळे ३३ टक्के प्रवासी क्षमता वाढली.

हेही वाचा- मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग : इगतपुरी – आमणे टप्प्याचे ७९ टक्के काम पूर्ण, सर्वात कठीण आणि आव्हानात्मक कामाचा समावेश

मुंबई विभागात २०१९ मध्ये ५५५.५ किमी मार्गाचे पूर्णपणे विद्युतीकरण करण्यात आले. सर्वात शेवटचे विद्युतीकरण पनवेल – पेण – रोहा यादरम्यान करण्यात आले. यामुळे रायगड आणि अलिबाग जिल्ह्यांना मुंबई महानगराशी जोडण्यासाठी फायदा झाला आहे. २०२२-२३ या वर्षात मेल / एक्स्प्रेस गाड्यांच्या ७७ फेऱ्या विद्युत इंजिनात बदलल्या. मुंबई विभागात विद्युत इंजिनावर चालणाऱ्या महत्त्वाच्या गाड्यांमध्ये राजधानी एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, पंजाब मेल, तेजस एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेसचा समावेश आहे.

Story img Loader