मुंबई : करोनाच्या संसर्गामुळे जवळपास संपूर्ण वर्ष शाळा बंद असलेल्या २०२०-२१ या वर्षांत राज्य हे शालेय शिक्षणिक स्थितीच्या प्रतवारीत सर्वोत्तम ठरले. महाराष्ट्राप्रमाणेच केरळ आणि पंजाबही हजारपैकी ९२८ गुण मिळवून प्रथम स्थानी आहे.

केंद्रीय शिक्षण विभागाकडून दरवर्षी अध्ययन निष्पत्ती, पायाभूत सुविधा, प्रवेश, समन्याय आणि प्रशासकीय कार्यप्रणाली अशा पाच निकषांनुसार राज्यांची शालेय शिक्षणाची प्रतवारी (परफॉर्मन्स ग्रेिडग इंडेक्स) जाहीर करण्यात येते. यातील सर्व निकषांमध्ये मिळून ७० मापदंड निश्चित करण्यात आले. त्यासाठी केंद्राच्या विविध योजनांच्या संकेतस्थळावर शाळांनी नोंदवलेली माहिती विचारात घेण्यात येते. यापूर्वीच्या म्हणजे २०१९-२० या शैक्षणिक वर्षांतील प्रतवारीनुसार राज्याला देशात आठवा क्रमांक होता. मात्र २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांत राज्याची ५९ गुणांची वाढ झाली. पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय कार्यप्रणाली या दोन निकषांमध्ये राज्याची कामगिरी सुधारल्याचे दिसते.

Guidance for 10th-12th students State Board appoints counsellors
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन… राज्य मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
विद्यापीठातील निकालांची रखडपट्टी; नव्याने निकाल तयार करण्याची वेळ
Maharashtra: 784 percent schools in state now have computer facilities, says report
राज्यातील ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक वाचन, गणित विषयात प्रगती, शालेय शिक्षण विभागाचा दावा
10th exam, 12th exam, Maharashtra state board ,
राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द
state education department big decision vanish blank pages textbooks
शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, पाठ्यपुस्तकांतून वह्यांची कोरी पाने हद्दपार
BMC cbse and icse school 10th class exams news in marathi
पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेचे विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार, पालिकेच्या शिक्षण विभागाची कसोटी
kolhapur becomes first district to ensure 100 percent cctv coverage in government schools
कोल्हापुरातील शाळांना ‘सीसीटीव्ही’चे कवच ! राज्यातील पहिला जिल्हा, १९५८ शाळांमध्ये यंत्रणा कार्यान्वित

अध्ययन निष्पत्तीत सुधारणा नाही

प्रतवारी निश्चित करण्यासाठी असलेल्या निकषांमध्ये अध्ययन, अध्यापन प्रक्रियेशी थेट निगडित असलेला निकष म्हणजे अध्ययन निष्पत्ती. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची इयत्ता आणि त्याने आत्मसात करणे आवश्यक असलेली कौशल्ये या अनुषंगाने अध्ययन निष्पत्तीचे निकष निश्चित केले आहेत. अध्ययन निष्पत्तीसाठी राज्याला २०१९-२० च्या अहवालानुसार १४४ गुण मिळाले होते.  गुरुवारी जाहीर झालेल्या २०२०-२१ च्या अहवालानुसार या गुणांमध्ये काहीही फरक पडलेला नाही.

शाळा बंद तरीही..

करोनाच्या साथीमुळे राज्यातील शाळा या २०२०-२१ या संपूर्ण वर्षांत बंदच होत्या. प्रत्यक्ष वर्गातील अध्यापनाऐवजी ऑनलाइन अध्यापन, आभासी वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक सुविधांची वानवा राज्यातील दुर्गम भागासह अगदी शहरी, निमशहरी भागांतही जाणवली. नेमकी किती मुले शिक्षण प्रवाहात नाहीत याचाही नेमका अंदाज घेता येत नव्हता. श्रेणी निर्देशांकानुसार २०२०-२१ या वर्षांतील शालेय प्रवेश किंवा शिक्षणाची उपलब्धता या निकषासाठीचे गुण हे २०१९-२० प्रमाणेच म्हणजे ७६ आहेत. शाळा बंद असलेल्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांत पायाभूत सुविधा या निकषासाठीचे १७ गुण तर, प्रशासकीय कार्यप्रणाली या निकषासाठी ४१ गुण वाढले आहेत. समन्याय या निकषासाठी १ गुण अधिक मिळाला आहे.

राज्याचे निकषांनुसार गुण

                  २०१९-२०      २०२०-२१

अध्ययन निष्पत्ती        १४४          १४४

शाळा प्रवेश            ७६           ७६

पायाभूत सुविधा        १२६           १४३

समन्याय              २२४          २२५

प्रशासकीय कार्यप्रणाली    २९९          ३४०

Story img Loader