शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप केला आहे. नार्वेकरांची केंद्रीय कायदामंत्र्यांबरोबर बंद दाराआड तीन तास बैठक झाली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार आहे हे त्यांना सांगण्यात आलं आहे का? असा सवाल संजय राऊतांनी केला. तसेच या बैठकीमुळे लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहे, असंही राऊतांनी नमूद केलं. ते बुधवारी (१० मे) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “राहुल नार्वेकरांची कायदामंत्र्यांबरोबर बंद खोलीत तीन तास बैठक झाली. या बैठकीत कायदा मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार हे राहुल नार्वेकरांना सांगितलं आहे का? सर्वोच्च न्यायालय असा निर्णय देणार आहे, तुम्ही लंडन दौऱ्यावर जा म्हणून राहुल नार्वेकरांना कायदा मंत्र्यांनी सांगितलं का?”

supreme court on cbi in arvind kejriwal bail case
“CBI ची तुलना पिंजऱ्यातल्या पोपटाशी…”, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पुन्हा केली ‘त्या’ उक्तीची आठवण; नेमकं काय घडलं होतं तेव्हा?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
Girish Mahajan, High Court, Girish Mahajan news,
मंत्री गिरीश महाजनांवर उच्च न्यायालयाची नाराजी, काय आहे प्रकरण?
indian constitution
संविधानभान: न्यायपालिकेचे स्वातंत्र्य न्यायाधीश नियुक्त्या
Sugarcane, Delhi High Court, Supreme Court,
ऊस दराचा लढा दिल्ली उच्च न्यायालयात; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
president Draupadi Murmu, crimes against women, Kolkata doctor rape-murder, Alka Lamba, Congress criticism, Manipur violence, women’s empowerment,
माफ करा… राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूजी…काँग्रेसच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष असे का म्हणाल्या ?…
rohit pawar
Rohit Pawar : राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले, “उद्या महाराष्ट्रात येत आहात, तर…”

“…तर या देशाची अवस्था फार गंभीर होईल”

“हा देश कायद्यानुसार, संविधानानुसार चालतो. कायदा आणि संविधान काय निर्णय घेतो हे आम्ही पाहणार आहोत. या देशात राजकीय व्यभिचाराला पाठिंबा दिला गेला, तर या देशाची अवस्था फार गंभीर होईल,” असा इशारा संजय राऊतांनी दिला.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : Video: शरद पवारांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “सामनाला…”

“हे सर्व लोक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रभाव टाकत आहेत”

राऊत पुढे म्हणाले, “राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आहेत. आमदार अपात्रतेचा निर्णय माझ्याकडेच येईल, मी पाहून घेईन असं ते कसं म्हणू शकतात. ही कोणती दादागिरी आहे. याचा अर्थ हे सर्व लोक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रभाव टाकत आहेत.”

“…त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली”

“देशाचे कायदामंत्री राहुल नार्वेकरांबरोबर तीन तास बंद खोलीत चर्चा करतात. त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे,” असंही राऊतांनी नमूद केलं.