शिवसेना संस्थापक आणि अवघ्या मराठी मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचं १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर शिवाजी पार्कवर अलोट गर्दी जमा झाली. राज्यभरातील शिवसैनिक शिवाजी पार्क आणि कलानगरच्या दिशेने एकवटू लागली. त्यामुळे या गर्दीमुळे अनुचित प्रकार घडू शकला असता. परंतु, गर्दीचं चोख नियोजन केलं गेलं. तत्कालीन मुंबई दक्षिण विभागाते अप्पर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शिवसैनिकांची नस ओळखून यावेळी गर्दीचं नियंत्रण केलं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचं अंत्यदर्शन आणि अंत्यविधी सुरळीत पार पडले. या दुखद प्रसंगी लोकांच्या भावनेचा आदर करत गर्दीवर नियंत्रण मिळवणं कठीण काम होतं. पण हे कठीण काम विश्वास नांगरे पाटील यांनी हुशारी आणि चलाखीने चोख पार पाडलं, याविषयी त्यांनी काही वर्षांपूर्वी लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली होती.

१४ नोव्हेंबर २०१२ रोजी हजारोंच्या संख्येने लोक कलानगरच्या दिशेने जमा होत होती. प्रचंड गर्दी होती, हजारो लोक होते. १७ नोव्हेंबरला बाळासाहेबांचं निधन झालं. या गर्दीचं नियंत्रण करणं, व्यवस्थापन करणं कठीण होतं. तरीही याचं कसं नियोजन केलं असा प्रश्न विश्वास नांगरे पाटील यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, कठीण प्रसंग होता. अचानक गर्दी मोठ्या संख्येने आली. कारण, निधनाची बातमी वेगाने पसरली. मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारी मंडळी जमा झाले. दाढी वाढलेले, गळ्यात सोन्याची चेन असलेले, उंचपुरे आणि दांडगे शिवसैनिक आपला बाप मेल्यानंतर जसे रडतात तसे धायमोकलून रडताना मी पाहिलं. परिस्थिती खूप चिघळायला लागली, कारण त्यांना जाता येत नव्हतं. मिळेल त्याला शिव्या घालणं सुरू होतं.

Sangameshwar leopard story in marathi
संगमेश्वर हातीव येथे बिबट्या मृतावस्थेत आढळला
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Devotees take boat rides at the Sangam during ongoing Mahakumbh Mela, in Prayagraj, Uttar Pradesh, Friday, Feb. 7, 2025.
Mahakumbh 2025 : “महाकुंभमेळा चेंगराचेंगरीत मी माझी आई गमावली, आता तिच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी मला…”, मुलाने व्यक्त केली खंत
Policeman dies in accident while returning from funeral of women police
अंत्यसंस्कारावरून परतताना पोलिसाचा अपघाती मृत्यू
petitionin Bombay HC against Aditya Thackeray
दिशा सालियन मृत्यू प्रकरण: आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची याचिका का ऐकावी ? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा
Hema Malini
“ती फार मोठी घटना नव्हती”, भाजपा खासदार हेमा मालिनींचे महाकुंभातील चेंगराचेंगरीवर विधान; ३० जणांचा झाला होता मृत्यू
Crime
Crime News : ‘मृतदेहाचे दोन तुकडे करून वाटा…’, वडि‍लांच्या अंत्यविधीवरून भिडले भाऊ; शेवटी ‘असा’ निघाला तोडगा
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’

हेही वाचा >> “त्यांनी कमळाबाईच्या दारात बसून…”, संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला; म्हणाले, “काल जे झालं…!”

“१४ नोव्हेंबर रोजी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कपाऊंडच्या आत जाताना इजा झाली होती. दुसऱ्या दिवशी निधनाची अफवा पसरली होती. यावेळी गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. दगफेक झाली, चपला फेकल्या गेल्या. त्यावेळी मी एक युक्ती केली. माझा प्रेजेंस ऑफ माईंड असेल. महिला कार्यकर्ता आणि महिला पोलिसांना पुढे तैनात केलं. हा निर्णय आत्मघातकीही ठरला असता. शिवसैनिक महिलांवर हात उगारत नाहीत असा माझा अनुभव होता. त्यामुळे मी महिला कर्मचारी तैनात केले. त्यावेळी मी लाऊड स्पीकरवर अनाऊन्स केलं की महिला कर्मचारी तैनात केले आहेत. तसंच, तुम्ही ज्या ठिकाणी चपला फेकत आहात आणि दगडं मारत आहात त्या दिशेला बाळासाहेबांचं पार्थिव आहे. कृपया संयम ठेवा. ही युक्ती यशस्वी ठरली. मग परिस्थिती शांत झाली. साधारण सात ते आठ लाख लोक टप्याटप्प्याने जमा झाली होती”, अशीही माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

हेही वाचा >> बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील राड्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक…”

“यावेळी तीन प्रकारचं नियोजन केलं होतं. गर्दीचं नियमन, ट्राफिकचं नियमन आणि कोणताही घातपात होणार नाही याचं नियमन केलं होतं. आठ ते दहा कर्मचाऱ्यांच्या पथकात लाठी, हेल्मेट आणि शिल्ड असलेले पोलीस होते. यांची जबाबदारी उपनिरिक्षकाकडे (Sub Inspector) सोपवली होती. तर, प्रत्येक तीन उपनिरिक्षकाची जबाबदारी एका निरिक्षकाकडे आणि तीन निरिक्षकांची जबाबदारी सहाय्यक पोलीस अधिक्षक (ACP) यांच्याकडे होती. या सर्वांचं एक पिरॅमिड करून टीम तयार केली होती. तसंच, या प्रत्येक टीममध्ये ट्राफिकचेही कर्मचारी होते. त्यामुळे सुटसुटीत बंदोबस्त झाला. या टीमना मॅनेजमेंट करणारी यंत्रणा होती. त्यांच्याशी वायरलेसमार्फत संवाद सुरू होता. त्यामुळे ही गर्दी नियंत्रण करताना फायदा झाला”, अशी माहिती विश्वास नांगरेंनी दिली होती.

दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्याने आता बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त शिंदे गट आदल्या दिवशी सायंकाळी स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतात. काल (१६ नोव्हेंबर) शिंदे गट स्मृतीस्थळावर गेले असता तिथे तुफान राडा झाला. याचे पडसाद आजही उमटत आहेत.

Story img Loader