होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे या काळात सावंतवाडीपर्यंत जादा रेल्वे गाडय़ा सोडाव्यात, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
कोकणातील लाखो चाकरमानी मुंबईत स्थायिक झाले आहेत. ही मंडळी होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचे निमित्त साधून कोकणात धाव घेतात. त्यांना विनाविघ्न कोकणात पोहोचता यावे यासाठी याकाळात सावंतवाडीपर्यंत जादा रेल्वे गाडय़ा सोडाव्यात, अशी मागणी एफ-दक्षिण आणि एफ-उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष नाना आंबोले यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena demanded for extra buses for holi